शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:09 IST

शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे.

ठळक मुद्देशंकर अण्णा धोंडगे : शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे. गांधीजींनी मुठभर मीठ उचलून ब्रिटीश सत्येला आव्हान दिले. त्यावेळी काही लोकांनी बापूंवर टीका केली; पण तेच मूठभर मीठ उचलल्यामुळे देशात स्वातंत्र चळवळीचे वातावरण निर्माण झाले. शेतकºयांच्या आंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते तुरंगात गेले. ते आज कुठे दिसत नाही; पण प्रत्येक शेतकºयांच्या मनात आग खदखदत आहे. सत्तेत येण्यापूर्वीच्या आश्वासनांचे विस्मरण सरकारला झाले असून सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली आहे, असे परखड मत शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आश्रमात किसान मंचच्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाला क्रांती दिनापासून सेवाग्राम ते नाशिक, अशी शुभारंभ सभा आयोजित होती. यावेळी माजी आमदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी वर्धेत निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती. आता सरकारने निराशा केली. कर्जमाफी दिली तरी सरकारला पुढच्या कर्जमाफीची तयारी करावी लागेल. यापेक्षा शेती उत्पादनालाच असा भाव द्यावा, की जेणेकरून तो फायद्यात राहील, अशा मागणीचा रेटा ठेवावा लागेल. किशोर माथनकर म्हणाले की, क्रांती दिनाला या अभियानाचा प्रारंभ गांधीजींच्या आश्रमातून होत आहे. ‘चले जाव’च्या नाºयाने देश पेटून उठला आता शेतकरी पेटून उठण्यासाठी ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाने व्हावे; पण विरोधाचा एल्गार दिसत नसल्याने आंदोलनाची पायाभरणी उद्दिष्ट पूर्तीने व्हावी.याप्रसंगी जयवंत मठकर, माजी आमदार वसंत कार्लेकर, दत्ता पवार, राजू राऊत, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, नितीन राऊत, खेमराज कौर, दिवाकर गमे आदींनपी मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन संजय काकडे यांनी केले तर आभार टी.सी. राऊत यांनी मानले. जि.प. सदस्य अशोक तेलंग, लक्ष्मीनारायण सोनोने, शशांक घोडमारे, प्रा. स्वप्नील देशमुख, कृउबास सभापती श्याम कार्लेकर, अविनाश काकडे, सुनील भोगे, हातिम बाबू, विलास पाखरे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.सेवाग्राम, हिंगणघाट येथे रस्ता रोकोकिसान मंचचे शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान ५४ दिवसांचे असून २ आॅक्टोबर रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशनाने समारोप होणार आहे. ३२ जिल्ह्यांत अभियानातून शेतकºयांशी चर्चा केली जाणार आहे. प्रारंभी बापूकुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. यानंतर किसान मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सेवाग्राम आणि हिंगणघाट येथे प्रतिकात्मक रस्तारोको करीत अभियानातील विविध आंदोलनांचा परिचय दिला.