शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

मुलीमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण ठरतेय चिंतेची बाब

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर

पिंपळखुटा : देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब चिंतेची असून भावी पिढी अधिक सुदृढ असण्याकरिता आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुले आणि मुली लवकरच वयात येत असल्याने त्यांना लैंगिक शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे़ या दृष्टीकोनातून शासनाच्या वतीने राज्यात किशोर किशोरीसाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद आणि सेवा या केंद्राचे नाव बदलून ते आता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम असे करण्यात आले आहे़शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे़ १० ते १९ या वयोगटातील मुलामुलींची शारीरिक, लैंगिक आणि बौद्धिक वाढ होत असते़ मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होते़ त्यामुळे या दोन्ही गटात भावनिक, मानसिक, वैचारिक बदल होत असतात़ यावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी पालक, शिक्षक किंवा नातेवाईक मोकळेपणाने त्यांना माहिती देवू शकत नाही़ अर्थातच त्यामुळे या वयात मुलामुलींमध्ये परस्परांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होते़ अनेकवेळा लैंगिक बाबतीत गैरसमजही निर्माण होतात़ त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते़ शासनाकडून होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याने या समस्यात वाढ होताना दिसून येत आहे. शासनाने राज्यभरात किशोरवयीन मुलामुलींना समुपदेशन करण्यासाठी सुमारे १५० मैत्री क्लिनीक केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्रात मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येते़ तेथे त्यांच्याबद्दल नोंदविण्यात आलेल्या माहितीची गोपनियता ठेवण्यात येते़ आहार, विवाह, गरोदरपन, गर्भपात, प्रजनन संस्थेचे आजार, व्यसनमुक्ती याबाबत सल्ला आणि उपचाराकरिता परिचारिका, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि जज्ज्ञ उपलब्ध असतात़ यासह किशोरवयीन मुलींना आहाराविषयक योग्य माहिती देऊन रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न गरजेचे असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले़(वार्ताहर)