शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

पाटबंधारे विभागाच्या वसाहती झाल्या ‘खंडर’

By admin | Updated: February 27, 2016 02:27 IST

कोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून

शासकीय औदासीन्य : घरे मोजताहेत अखेरच्या घटकाविजय माहुरे सेलूकोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून वसाहतीच्या पुनर्निर्माणाकरिता पाटबंधारे विभागाला अच्छे दिन कधी येणार याची प्रतीक्षा कायम आहे.सेलू तालुक्यातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी बोर धरणाची सिंचन व्यवस्था उपयोगी ठरली. बोरधरण (यशवंत धरण) ला ५० वर्ष पूर्ण झाले त्यावेळी सेलू, केळझर व हिंगणी येथे सिंचन व्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यालये व कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधकाम आल्या. सुरुवातीला या वसाहतीत कर्मचारी राहत असत. पण दिवसेंदिवस वसाहतीच्या डागडुजीकडे दर्लक्ष होत गेले. त्यातच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभरती थांबल्याने या वसाहती पोरक्या होत गेल्या. अधिकारीच परजिल्ह्यातून सिंचन व्यवस्था सांभाळत असेल तर आम्ही मुख्यालयी का रहावे अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने या वसाहतींची आणखीनच वाताहत होत पडझड सुरू झाली. सध्या या वसाहतींच्या सभोवताल मोठ मोठी झाडे वाढली आहेत. झाडाझुडपांच्या कचाट्यात शेवटच्या घटका या वसाहती मोजत आहेत. बोरधरण, हिंगणी, सेलू, केळझर येथील वसाहतीचे खस्ताहाल पाहता पाटबंधारे विभाग केवळ नावापुरताच तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून वितरिका, सायपण, पाणचऱ्यांची पुरती वाट लागल्याचे लक्षात येते. जलसंपत्तीचा अपव्यय होत असून कुणालाही याचे देणे घेणे नसल्याचे वास्तव आहे. लाखो लीटर पाण्याचा अपव्यय थांबविण्यात जर यश आले तर अधिक शेती सिंचनाखाली येवू शकते.सेलू येथे असलेली उपविभागीय अभियंता कार्यालयाची इमारत गत १५ वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आली. पण अल्पावधीतच या इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. इमारतीला भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. ही इमारत आणि वसाहत वर्धा-नागपूर व सेलू-बोधरण या मार्गावर चौकाला लागून आहे. कोट्यवधी रुपयांची जागा आज पडीक जमिनीचे रूप धारण करीत आहे. बोधरणापासून केळझरवरून पुढे जाणाऱ्या मुख्य कालव्यात वाढलेली झाडेझुडपे पाहता शेताच्या बांधापर्यंत जाणाऱ्या पाटचऱ्याची काय अवस्था असेल याचा प्रात्यय येतो. पण याकडे लक्षच दिले जात नसल्याची खंत तालुकावासी व्यक्त करीत आहे.चांगल्या दिवसाची स्वप्ने दाखविणाऱ्या शासनाच्या आगामी अधिवेशनात तरी बोर प्रकल्पाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले जाणार हा असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालकमंत्री वर्धा जिल्ह्यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत निधींची पूर्तता करीत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी पाटबंधारे विभागाकडेही लक्ष दिल्यास दुरावस्था थांबू शकेल अशी आशा व्यक्त होत आहे.