शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाच्या वसाहती झाल्या ‘खंडर’

By admin | Updated: February 27, 2016 02:27 IST

कोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून

शासकीय औदासीन्य : घरे मोजताहेत अखेरच्या घटकाविजय माहुरे सेलूकोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून वसाहतीच्या पुनर्निर्माणाकरिता पाटबंधारे विभागाला अच्छे दिन कधी येणार याची प्रतीक्षा कायम आहे.सेलू तालुक्यातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी बोर धरणाची सिंचन व्यवस्था उपयोगी ठरली. बोरधरण (यशवंत धरण) ला ५० वर्ष पूर्ण झाले त्यावेळी सेलू, केळझर व हिंगणी येथे सिंचन व्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यालये व कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधकाम आल्या. सुरुवातीला या वसाहतीत कर्मचारी राहत असत. पण दिवसेंदिवस वसाहतीच्या डागडुजीकडे दर्लक्ष होत गेले. त्यातच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभरती थांबल्याने या वसाहती पोरक्या होत गेल्या. अधिकारीच परजिल्ह्यातून सिंचन व्यवस्था सांभाळत असेल तर आम्ही मुख्यालयी का रहावे अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने या वसाहतींची आणखीनच वाताहत होत पडझड सुरू झाली. सध्या या वसाहतींच्या सभोवताल मोठ मोठी झाडे वाढली आहेत. झाडाझुडपांच्या कचाट्यात शेवटच्या घटका या वसाहती मोजत आहेत. बोरधरण, हिंगणी, सेलू, केळझर येथील वसाहतीचे खस्ताहाल पाहता पाटबंधारे विभाग केवळ नावापुरताच तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून वितरिका, सायपण, पाणचऱ्यांची पुरती वाट लागल्याचे लक्षात येते. जलसंपत्तीचा अपव्यय होत असून कुणालाही याचे देणे घेणे नसल्याचे वास्तव आहे. लाखो लीटर पाण्याचा अपव्यय थांबविण्यात जर यश आले तर अधिक शेती सिंचनाखाली येवू शकते.सेलू येथे असलेली उपविभागीय अभियंता कार्यालयाची इमारत गत १५ वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आली. पण अल्पावधीतच या इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. इमारतीला भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. ही इमारत आणि वसाहत वर्धा-नागपूर व सेलू-बोधरण या मार्गावर चौकाला लागून आहे. कोट्यवधी रुपयांची जागा आज पडीक जमिनीचे रूप धारण करीत आहे. बोधरणापासून केळझरवरून पुढे जाणाऱ्या मुख्य कालव्यात वाढलेली झाडेझुडपे पाहता शेताच्या बांधापर्यंत जाणाऱ्या पाटचऱ्याची काय अवस्था असेल याचा प्रात्यय येतो. पण याकडे लक्षच दिले जात नसल्याची खंत तालुकावासी व्यक्त करीत आहे.चांगल्या दिवसाची स्वप्ने दाखविणाऱ्या शासनाच्या आगामी अधिवेशनात तरी बोर प्रकल्पाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले जाणार हा असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालकमंत्री वर्धा जिल्ह्यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत निधींची पूर्तता करीत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी पाटबंधारे विभागाकडेही लक्ष दिल्यास दुरावस्था थांबू शकेल अशी आशा व्यक्त होत आहे.