शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शेणखताचे खड्डे देताहेत आजारांना निमंत्रण

By admin | Updated: July 13, 2016 02:53 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.

तुळजापूरकर त्रस्त : तक्रारींकडेही दुर्लक्ष वर्धा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. असे असले तरी आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जागेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी, तुळजापूर (वघाळा) येथेही शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पूर्वी शेणाचे खड्डे गावाच्या एका बाजूला राहत होते. त्यासाठी राखीव सरकारी जागा राहत होती; पण सरकारी राखीव जागेवर ग्रामस्थांकडून अतिक्रमण करण्यात आले. शिवाय सरकारी इमारतींचे बांधकाम झाल्याने शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर आले आहेत. शिवाय काही घराशेजारी इंधनाचे ढिग दिसून येतात. यामुळे डासांची उत्पत्ती होत असून सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही वाढली आहे. ग्रामीण भागात कठोर पावले उचलली जात नसल्याने शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देत आहे. तुळजापूर येथे वॉर्ड क्र. तीनमध्ये गुणवंत वैद्य, रामभाऊ मोहदुरे, गजानन जामुनकर यांच्या घरासमोर रस्त्यालगत शेणखताचे आठ-दहा खड्डे आहेत. गट ग्रा.पं. वघाळा तुळजापूर यांना याबाबत निवेदन देऊनही परिस्थिती जैसे थे आहे. २००९ मध्ये निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यात ग्रा.पं. वघाळा तुळजापूरला निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला; पण ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे ते दिवस पुन्हा येणे नाही, असे चित्र आहे. डांबरीकरणावर लोक शौचास बसत असल्याने रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजार पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर)