शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

शेणखताचे खड्डे देताहेत आजारांना निमंत्रण

By admin | Updated: July 13, 2016 02:53 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.

तुळजापूरकर त्रस्त : तक्रारींकडेही दुर्लक्ष वर्धा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. असे असले तरी आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जागेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी, तुळजापूर (वघाळा) येथेही शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पूर्वी शेणाचे खड्डे गावाच्या एका बाजूला राहत होते. त्यासाठी राखीव सरकारी जागा राहत होती; पण सरकारी राखीव जागेवर ग्रामस्थांकडून अतिक्रमण करण्यात आले. शिवाय सरकारी इमारतींचे बांधकाम झाल्याने शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर आले आहेत. शिवाय काही घराशेजारी इंधनाचे ढिग दिसून येतात. यामुळे डासांची उत्पत्ती होत असून सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही वाढली आहे. ग्रामीण भागात कठोर पावले उचलली जात नसल्याने शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देत आहे. तुळजापूर येथे वॉर्ड क्र. तीनमध्ये गुणवंत वैद्य, रामभाऊ मोहदुरे, गजानन जामुनकर यांच्या घरासमोर रस्त्यालगत शेणखताचे आठ-दहा खड्डे आहेत. गट ग्रा.पं. वघाळा तुळजापूर यांना याबाबत निवेदन देऊनही परिस्थिती जैसे थे आहे. २००९ मध्ये निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यात ग्रा.पं. वघाळा तुळजापूरला निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला; पण ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे ते दिवस पुन्हा येणे नाही, असे चित्र आहे. डांबरीकरणावर लोक शौचास बसत असल्याने रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजार पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर)