शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताचे खड्डे देताहेत आजारांना निमंत्रण

By admin | Updated: July 13, 2016 02:53 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.

तुळजापूरकर त्रस्त : तक्रारींकडेही दुर्लक्ष वर्धा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. असे असले तरी आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जागेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी, तुळजापूर (वघाळा) येथेही शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पूर्वी शेणाचे खड्डे गावाच्या एका बाजूला राहत होते. त्यासाठी राखीव सरकारी जागा राहत होती; पण सरकारी राखीव जागेवर ग्रामस्थांकडून अतिक्रमण करण्यात आले. शिवाय सरकारी इमारतींचे बांधकाम झाल्याने शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर आले आहेत. शिवाय काही घराशेजारी इंधनाचे ढिग दिसून येतात. यामुळे डासांची उत्पत्ती होत असून सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही वाढली आहे. ग्रामीण भागात कठोर पावले उचलली जात नसल्याने शेणखताचे खड्डे आजारांना निमंत्रण देत आहे. तुळजापूर येथे वॉर्ड क्र. तीनमध्ये गुणवंत वैद्य, रामभाऊ मोहदुरे, गजानन जामुनकर यांच्या घरासमोर रस्त्यालगत शेणखताचे आठ-दहा खड्डे आहेत. गट ग्रा.पं. वघाळा तुळजापूर यांना याबाबत निवेदन देऊनही परिस्थिती जैसे थे आहे. २००९ मध्ये निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यात ग्रा.पं. वघाळा तुळजापूरला निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला; पण ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे ते दिवस पुन्हा येणे नाही, असे चित्र आहे. डांबरीकरणावर लोक शौचास बसत असल्याने रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजार पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर)