शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

उघाड मिळताच आंतरमशागतीला वेग

By admin | Updated: July 14, 2016 02:13 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते.

शेतीकामांची लगबग : ३ लाख ५५ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी वर्धा : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. हा या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस असल्याने पिकांच्या वाढीसाठी तो पोषकच आहे. पण पाऊस थांबतच नसलेल्या शेतकरी वर्गाला आंतरमशागतीचा प्रश्न सतावत होता. कालपासून काहीशी उघाड मिळताच आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात दामदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी खरीपातील पिके अंकुरली. विशेष म्हणजे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले. पण आठवडाभरापासून ठाण मांडलेला पाऊस उघाड केव्हा देतो याची वाट शेतकरी बघत होते. अतीपावसामुळेही साधलेली पिके नष्ट होण्याचीही भीती शेतकऱ्यांना होती. पण मंगळवारपासून पावसाने काहीशी उघाड दिली. त्यामुळे लगोलग शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतला आहे. यामध्ये डवरणी, फवारणी, निंदन, खत टाकणे यासह इतरही कामांना वेग आला आहे. काही दिवस उघाड देऊन पाऊस यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यासाठी गावागावांत मजूरवर्गाचा शोध सुरू आहे. तसेच फवारणीची औषधे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.(शहर प्रतिनिधी) पिकांच्या फवारणीलाही आला वेग पिकांचे किटकांपासून रक्षण व्हावे, यासाठी फवारणी केली जाते. पाऊस थांबताच फवारणीला वेग आला आहे. आधीच अत्यल्प उत्पन्नामुळे गतवर्षी शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे यंदा त्यांना कुठलीही जोखीम घ्यावयाची नाही. त्यामुळे फवारणी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पंपांमुळे आता फवारणी पूर्वीपेक्षा काहीशी सोपी झाली आहे. बरेच शेतकरीच आता स्वत:च्या शेतात फवारणी करून घेत आहेत.