शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उघाड मिळताच आंतरमशागतीला वेग

By admin | Updated: July 14, 2016 02:13 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते.

शेतीकामांची लगबग : ३ लाख ५५ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी वर्धा : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. हा या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस असल्याने पिकांच्या वाढीसाठी तो पोषकच आहे. पण पाऊस थांबतच नसलेल्या शेतकरी वर्गाला आंतरमशागतीचा प्रश्न सतावत होता. कालपासून काहीशी उघाड मिळताच आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात दामदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी खरीपातील पिके अंकुरली. विशेष म्हणजे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले. पण आठवडाभरापासून ठाण मांडलेला पाऊस उघाड केव्हा देतो याची वाट शेतकरी बघत होते. अतीपावसामुळेही साधलेली पिके नष्ट होण्याचीही भीती शेतकऱ्यांना होती. पण मंगळवारपासून पावसाने काहीशी उघाड दिली. त्यामुळे लगोलग शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतला आहे. यामध्ये डवरणी, फवारणी, निंदन, खत टाकणे यासह इतरही कामांना वेग आला आहे. काही दिवस उघाड देऊन पाऊस यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यासाठी गावागावांत मजूरवर्गाचा शोध सुरू आहे. तसेच फवारणीची औषधे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.(शहर प्रतिनिधी) पिकांच्या फवारणीलाही आला वेग पिकांचे किटकांपासून रक्षण व्हावे, यासाठी फवारणी केली जाते. पाऊस थांबताच फवारणीला वेग आला आहे. आधीच अत्यल्प उत्पन्नामुळे गतवर्षी शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे यंदा त्यांना कुठलीही जोखीम घ्यावयाची नाही. त्यामुळे फवारणी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पंपांमुळे आता फवारणी पूर्वीपेक्षा काहीशी सोपी झाली आहे. बरेच शेतकरीच आता स्वत:च्या शेतात फवारणी करून घेत आहेत.