शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

उघाड मिळताच आंतरमशागतीला वेग

By admin | Updated: July 14, 2016 02:13 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते.

शेतीकामांची लगबग : ३ लाख ५५ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी वर्धा : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. हा या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस असल्याने पिकांच्या वाढीसाठी तो पोषकच आहे. पण पाऊस थांबतच नसलेल्या शेतकरी वर्गाला आंतरमशागतीचा प्रश्न सतावत होता. कालपासून काहीशी उघाड मिळताच आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात दामदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी खरीपातील पिके अंकुरली. विशेष म्हणजे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले. पण आठवडाभरापासून ठाण मांडलेला पाऊस उघाड केव्हा देतो याची वाट शेतकरी बघत होते. अतीपावसामुळेही साधलेली पिके नष्ट होण्याचीही भीती शेतकऱ्यांना होती. पण मंगळवारपासून पावसाने काहीशी उघाड दिली. त्यामुळे लगोलग शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतला आहे. यामध्ये डवरणी, फवारणी, निंदन, खत टाकणे यासह इतरही कामांना वेग आला आहे. काही दिवस उघाड देऊन पाऊस यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यासाठी गावागावांत मजूरवर्गाचा शोध सुरू आहे. तसेच फवारणीची औषधे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.(शहर प्रतिनिधी) पिकांच्या फवारणीलाही आला वेग पिकांचे किटकांपासून रक्षण व्हावे, यासाठी फवारणी केली जाते. पाऊस थांबताच फवारणीला वेग आला आहे. आधीच अत्यल्प उत्पन्नामुळे गतवर्षी शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे यंदा त्यांना कुठलीही जोखीम घ्यावयाची नाही. त्यामुळे फवारणी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पंपांमुळे आता फवारणी पूर्वीपेक्षा काहीशी सोपी झाली आहे. बरेच शेतकरीच आता स्वत:च्या शेतात फवारणी करून घेत आहेत.