शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अन्न सुरक्षा कायद्यावर माहिती

By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST

समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे.

कारंजा(घा.) : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे. म्हणून या योजनेंतर्गत अन्नधान्य वाटप काटेकोरपणे व विना विलंब झाले पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी व्यक्त केले. कारंजा तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेत्यांसाठी सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला तहसीलदार बालपांडे व तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेते, विभाग प्रमुख सचिन गवळी उपस्थित होते. या जून महिन्यात एपीएल धारकांना ९.६० रुपये दराने ४ किलो तांदूळ व ७.२० रुपये दराने ७ किलो गहू, वाटप करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभाग प्रमुख सचिन गवळी यांनी दिली. तसेच १० तारखेच्या आत माल उचलून त्वरीत वितरित करण्याचा सल्ला दिला. तसेच असे करीत नसलेल्या स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.कारंजा तालुक्यात ‘अन्नपूर्णा’ योजनेचे १५५ कार्ड धारक असून त्यांना प्रतिकार्ड १० किलो धान्य विनामुल्य दिले जाईल. तसेच अंत्योदय योजनेचे, तालुक्यात ४ हजार ७५८ कार्ड धारक असून प्रत्येक कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरीत केले जाईल. ४४ हजार रुपयाच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्या कार्डधारकांना प्रती माणसी ५ किलो धान्य मिळत आहे. धान्य सुरळीत मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी, तहसील कार्यालयाला केली आहे. त्याची चौकशी करुन त्वरीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदाराने यावेळी दिली. काही स्वस्त धान्य दुकानदार, आपल्या सोयीनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उशिरा धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही. म्हणून अनेकांना त्याच्या हिस्याचा कोटा मिळत नाही. असा गैरव्यवहार आढळल्यास ग्राहकांनी लेखी तक्रार संबंधित विभागाला करावी अशी माहिती . म्हणजे त्वरीत कारवाई करता येईल, असे आश्वासन जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी जनतेला दिले. यावेळी परिसरातील स्वस्त धान्य विक्रेत्यांची उपस्थिती होती. त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)