शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

अन्न सुरक्षा कायद्यावर माहिती

By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST

समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे.

कारंजा(घा.) : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे. म्हणून या योजनेंतर्गत अन्नधान्य वाटप काटेकोरपणे व विना विलंब झाले पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी व्यक्त केले. कारंजा तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेत्यांसाठी सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला तहसीलदार बालपांडे व तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेते, विभाग प्रमुख सचिन गवळी उपस्थित होते. या जून महिन्यात एपीएल धारकांना ९.६० रुपये दराने ४ किलो तांदूळ व ७.२० रुपये दराने ७ किलो गहू, वाटप करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभाग प्रमुख सचिन गवळी यांनी दिली. तसेच १० तारखेच्या आत माल उचलून त्वरीत वितरित करण्याचा सल्ला दिला. तसेच असे करीत नसलेल्या स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.कारंजा तालुक्यात ‘अन्नपूर्णा’ योजनेचे १५५ कार्ड धारक असून त्यांना प्रतिकार्ड १० किलो धान्य विनामुल्य दिले जाईल. तसेच अंत्योदय योजनेचे, तालुक्यात ४ हजार ७५८ कार्ड धारक असून प्रत्येक कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरीत केले जाईल. ४४ हजार रुपयाच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्या कार्डधारकांना प्रती माणसी ५ किलो धान्य मिळत आहे. धान्य सुरळीत मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी, तहसील कार्यालयाला केली आहे. त्याची चौकशी करुन त्वरीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदाराने यावेळी दिली. काही स्वस्त धान्य दुकानदार, आपल्या सोयीनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उशिरा धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही. म्हणून अनेकांना त्याच्या हिस्याचा कोटा मिळत नाही. असा गैरव्यवहार आढळल्यास ग्राहकांनी लेखी तक्रार संबंधित विभागाला करावी अशी माहिती . म्हणजे त्वरीत कारवाई करता येईल, असे आश्वासन जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी जनतेला दिले. यावेळी परिसरातील स्वस्त धान्य विक्रेत्यांची उपस्थिती होती. त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)