शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना घरघर, बेरोजगारी वाढली हर घर; नवीन प्रकल्पांना चालना नाही, विस्तारही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 12:08 IST

जुन्या कंपन्यांना टाळे, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न

वर्धा : गांधी जिल्हा म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या या जिल्ह्यात सेवाग्राम व पवनार हा परिसर वगळून इतर ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली होती; परंतु या उद्योगांच्या विस्ताराकरिता चालना मिळाली नसल्याने उद्योग व प्रकल्पांना अल्पावधीतच घरघर लागली. अनेक जुन्या प्रकल्पांना टाळे लागले असून, नवीन प्रकल्प दिवास्वप्नच ठरत असल्याने जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर व कारंजा (घाडगे) या ठिकाणी पाच औद्योगिक वसाहती आहेत. या एमआयडीसी परिसरातील बहुतांश भूखंड रिकामे पडले असून, त्या ठिकाणी जनावरे चरताना दिसतात. काहींनी या भूखंडावर टोलेजंग बंगले बांधून निवासी वापर चालविला आहे. जे काही मोजके उद्योग सुरू आहेत, त्यातील काहींची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सेलू तालुक्यातील हिंगणी येथील नोबेल एक्सप्लोझिव्ह कंपनी बंद पडली. कारंजा तालुक्यातील संत्रा प्रक्रिया उद्योगाचेही भिजत घोंगडे आहे. वादात सापडलेला लॅन्को प्रकल्प सुरूच होऊ शकला नाही. भूगावच्या लॉयड्स कंपनीचाही विस्तार होऊ न शकल्यामुळे आधीच उद्योगांची कमी असलेल्या या गांधी जिल्ह्यात उद्योग विकास खुंटला आहे. संबंधित विभागही फारसा उत्साही नसल्याने पाच औद्योगिक वसाहती असतानाही रोजगार उपलब्ध होताना दिसत नाही.

नवउद्योजकांना जागा मिळण्यासाठी अडचणी

जिल्ह्यातील पाचही एमआयडीसी परिसरात अनेकांनी उद्योग उभारणीकरिता भूखंड घेऊन ठेवले आहेत; ठरावीक कालावधीमध्ये उद्योग उभा न झाल्यास ते भूखंड परत घेण्याचा अधिकार एमआयडीसी प्रशासनाला आहे; परंतु एमआयडीसी प्रशासन आणि काही राजकीय व्यक्तीच्या हितसंबंधातून हे भूखंड ओसाड पडलेले आहेत. काहींनी नियमबाह्यरीत्या या भूखंडांवर बंगले, दुकाने, लॉन, कॉलेज व शाळा सुरू केल्या आहेत. असे असतानाही एमआयडीसी प्रशासन मूग गिळून असल्यामुळे नवउद्योजकांना भूखंड मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात संबंधित विभागात माहिती मागितली तर एकमेकांकडे बोट दाखवून ते नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात.

स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांना प्राधान्य

जिल्ह्यात भूगाव येथील लॉयड्स स्टील, देवळी येथील महालक्ष्मी व गॅमन इंडिया यासारख्या बोटावर मोजण्याइतक्याच मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षकांपासून तर कुशल कामगारांपर्यंत परप्रांतीय मजूर व कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अनेक बेरोजगार तरुण व संघटनाही रोजगाराच्या मागणीकरिता सातत्याने आंदोलन करताना दिसतात.

उद्योग उभारणीकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. तरीही नवीन उद्योजक तयार होत नाही. उद्योजकांची मुले विदेशात गेली आहेत. त्यांच्याकरिता जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून नवीन उद्योगांसाठी शासनाने पाठपुरावा करायला हवा, उद्योग उभारणीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, एमआडीसी क्षेत्रात रेड आणि ऑरेंज उद्योगांना परवानगी मिळावी. बँकिंग धोरण राबविणाऱ्या यंत्रणेमध्ये सामंजस्य हवे.

- प्रवीण हिवरे, अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन, वर्धा

एमआयडीसीचे क्षेत्र (सन-२०२१ ची आकडेवारी)

*गाव - क्षेत्र - भूखंड - वाटप*

  • वर्धा - ३१२.१९ हेक्टर ४९१ - ४५४
  • देवळी - २५८.६० हेक्टर - १०१ - ९५
  • समुद्रपूर - १५.६७ हेक्टर - ४५ - ४५
  • कारंजा (घा.) - ११.७० हेक्टर - ३५ - २९
  • हिंगणघाट - १०.३० हेक्टर - ५४ - ५४
टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसायGovernmentसरकारwardha-acवर्धा