शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उद्योगांना घरघर, बेरोजगारी वाढली हर घर; नवीन प्रकल्पांना चालना नाही, विस्तारही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 12:08 IST

जुन्या कंपन्यांना टाळे, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न

वर्धा : गांधी जिल्हा म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या या जिल्ह्यात सेवाग्राम व पवनार हा परिसर वगळून इतर ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली होती; परंतु या उद्योगांच्या विस्ताराकरिता चालना मिळाली नसल्याने उद्योग व प्रकल्पांना अल्पावधीतच घरघर लागली. अनेक जुन्या प्रकल्पांना टाळे लागले असून, नवीन प्रकल्प दिवास्वप्नच ठरत असल्याने जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर व कारंजा (घाडगे) या ठिकाणी पाच औद्योगिक वसाहती आहेत. या एमआयडीसी परिसरातील बहुतांश भूखंड रिकामे पडले असून, त्या ठिकाणी जनावरे चरताना दिसतात. काहींनी या भूखंडावर टोलेजंग बंगले बांधून निवासी वापर चालविला आहे. जे काही मोजके उद्योग सुरू आहेत, त्यातील काहींची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सेलू तालुक्यातील हिंगणी येथील नोबेल एक्सप्लोझिव्ह कंपनी बंद पडली. कारंजा तालुक्यातील संत्रा प्रक्रिया उद्योगाचेही भिजत घोंगडे आहे. वादात सापडलेला लॅन्को प्रकल्प सुरूच होऊ शकला नाही. भूगावच्या लॉयड्स कंपनीचाही विस्तार होऊ न शकल्यामुळे आधीच उद्योगांची कमी असलेल्या या गांधी जिल्ह्यात उद्योग विकास खुंटला आहे. संबंधित विभागही फारसा उत्साही नसल्याने पाच औद्योगिक वसाहती असतानाही रोजगार उपलब्ध होताना दिसत नाही.

नवउद्योजकांना जागा मिळण्यासाठी अडचणी

जिल्ह्यातील पाचही एमआयडीसी परिसरात अनेकांनी उद्योग उभारणीकरिता भूखंड घेऊन ठेवले आहेत; ठरावीक कालावधीमध्ये उद्योग उभा न झाल्यास ते भूखंड परत घेण्याचा अधिकार एमआयडीसी प्रशासनाला आहे; परंतु एमआयडीसी प्रशासन आणि काही राजकीय व्यक्तीच्या हितसंबंधातून हे भूखंड ओसाड पडलेले आहेत. काहींनी नियमबाह्यरीत्या या भूखंडांवर बंगले, दुकाने, लॉन, कॉलेज व शाळा सुरू केल्या आहेत. असे असतानाही एमआयडीसी प्रशासन मूग गिळून असल्यामुळे नवउद्योजकांना भूखंड मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात संबंधित विभागात माहिती मागितली तर एकमेकांकडे बोट दाखवून ते नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात.

स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांना प्राधान्य

जिल्ह्यात भूगाव येथील लॉयड्स स्टील, देवळी येथील महालक्ष्मी व गॅमन इंडिया यासारख्या बोटावर मोजण्याइतक्याच मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षकांपासून तर कुशल कामगारांपर्यंत परप्रांतीय मजूर व कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अनेक बेरोजगार तरुण व संघटनाही रोजगाराच्या मागणीकरिता सातत्याने आंदोलन करताना दिसतात.

उद्योग उभारणीकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. तरीही नवीन उद्योजक तयार होत नाही. उद्योजकांची मुले विदेशात गेली आहेत. त्यांच्याकरिता जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून नवीन उद्योगांसाठी शासनाने पाठपुरावा करायला हवा, उद्योग उभारणीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, एमआडीसी क्षेत्रात रेड आणि ऑरेंज उद्योगांना परवानगी मिळावी. बँकिंग धोरण राबविणाऱ्या यंत्रणेमध्ये सामंजस्य हवे.

- प्रवीण हिवरे, अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन, वर्धा

एमआयडीसीचे क्षेत्र (सन-२०२१ ची आकडेवारी)

*गाव - क्षेत्र - भूखंड - वाटप*

  • वर्धा - ३१२.१९ हेक्टर ४९१ - ४५४
  • देवळी - २५८.६० हेक्टर - १०१ - ९५
  • समुद्रपूर - १५.६७ हेक्टर - ४५ - ४५
  • कारंजा (घा.) - ११.७० हेक्टर - ३५ - २९
  • हिंगणघाट - १०.३० हेक्टर - ५४ - ५४
टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसायGovernmentसरकारwardha-acवर्धा