शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By admin | Updated: July 11, 2016 02:01 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

जनमंचची मागणी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व प्रशासनाला साकडेरोहणा : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे ५० वर्षानंतर वाहन परवान्याची मुदत दर पाच वर्षांनी वाढविण्यासाठी वाहन चालकाला परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. उतार वयात चकरा मारणे सर्वांना अवघड होते. यामुळे कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षे करावी, अशी मागणी जनमंचने केली आहे. काही वर्षांपूर्वी जनमंचने एका आरटीओ अधिकाऱ्याची प्रकरणे उघड केली होती. त्या अधिकाऱ्याने एका दिवसात सर्वप्रकारचे दोन हजार परवाने वितरीत करण्याचा पराक्रम केला होता. सदर प्रकरण न्यायालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती. शासनाने वाहन परवान्याचे नुतनीकरण ५० वर्षांनंतर करण्याचा नियम केला; पण या नियमाचा जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी उपयोग होत आहे. आजच्या प्रचलित व्यवस्थेत सर्वांच्याच वाहन परवान्याचे पाच वर्षांसाठी नुतनीकरण करून मिळते. एखाद्या व्यक्तीला वाहन चालविणे शक्य नसल्यास तो वाहन चालविणारच नाही. यासाठीच पाच वर्षांनंतर नुतनीकरण करण्याचा नियम शिथील करणे काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे माणसाच्या जीवन जगण्याच्या कालमर्यादेत वाढ झाली आहे. अनेक शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कायम परवान्याची कालमर्यादा वाढविल्यास आरटीओ कार्यालयातील कामाचा बोझा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेची ओरड कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत जनमंचद्वारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनमंचच्या निवेदनाची दखल घेत याबाबत संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे. जनतेचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी वाहन परवान्याची कालमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्याची मागणी नागपूर जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फनिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)