शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By admin | Updated: July 11, 2016 02:01 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

जनमंचची मागणी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व प्रशासनाला साकडेरोहणा : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे ५० वर्षानंतर वाहन परवान्याची मुदत दर पाच वर्षांनी वाढविण्यासाठी वाहन चालकाला परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. उतार वयात चकरा मारणे सर्वांना अवघड होते. यामुळे कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षे करावी, अशी मागणी जनमंचने केली आहे. काही वर्षांपूर्वी जनमंचने एका आरटीओ अधिकाऱ्याची प्रकरणे उघड केली होती. त्या अधिकाऱ्याने एका दिवसात सर्वप्रकारचे दोन हजार परवाने वितरीत करण्याचा पराक्रम केला होता. सदर प्रकरण न्यायालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती. शासनाने वाहन परवान्याचे नुतनीकरण ५० वर्षांनंतर करण्याचा नियम केला; पण या नियमाचा जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी उपयोग होत आहे. आजच्या प्रचलित व्यवस्थेत सर्वांच्याच वाहन परवान्याचे पाच वर्षांसाठी नुतनीकरण करून मिळते. एखाद्या व्यक्तीला वाहन चालविणे शक्य नसल्यास तो वाहन चालविणारच नाही. यासाठीच पाच वर्षांनंतर नुतनीकरण करण्याचा नियम शिथील करणे काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे माणसाच्या जीवन जगण्याच्या कालमर्यादेत वाढ झाली आहे. अनेक शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कायम परवान्याची कालमर्यादा वाढविल्यास आरटीओ कार्यालयातील कामाचा बोझा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेची ओरड कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत जनमंचद्वारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनमंचच्या निवेदनाची दखल घेत याबाबत संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे. जनतेचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी वाहन परवान्याची कालमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्याची मागणी नागपूर जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फनिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)