शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:14 IST

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : काळी-पिवळी, आॅटोत कोंबतात प्रवासीकारंजा (घा.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. परिवहन महामंडळाच्या बसेस कमी असल्याने प्रवाश्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे पोलीस यंत्रणेसह सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक प्रवाश्यांच्या जीवावर बेतताना दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर नाही. वर्धा ते कारंजा तसेच अन्य मार्गावरही बसेस कमी असल्याने नागरिकांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या वाहनांद्वारे सर्रास प्रवासी वाहतूक केली जात असून प्रवाश्यांना अक्षरश: कोंबले जाते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. यातच प्रवासी कोंबलेली वाहने चालकांना व्यवस्थित चालविणे शक्य होत नसल्याने तीही अपघातग्रस्त होतात. रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करून प्रवासी घेणे, रस्त्यात कुठेही ‘ब्रेक’ दाबून वाहने थांबविणे आणि प्रवाश्यांची चढ-उतार करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळेच अपघाताची शक्यता बळावली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला जिल्ह्यात अधिकृत परवानगी असल्यागत ही वाहतूक होते. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)