शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्त्यालगतच्या बाभळाची अवैधरित्या कत्तल

By admin | Updated: April 4, 2017 01:22 IST

शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे.

पर्यावरणाला धोका : खाजगी कंत्राटदारांची अरेरावी, प्रशासनाचे दुर्लक्ष झडशी : शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे. सध्या येळाकेळी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. झडशी येथून जाणाऱ्या येळाकेळी ते वर्धा मार्गावर क्षीरसमुद्र व अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करणारी टोळी सक्रीय आहे. या टोळक्याद्वारे दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यात बहुतांश बाभूळीची झाडे कापली जात असल्याचे समोर आले आहे. या टोळक्याला अभय कुणाचे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. यापूर्वी झडशी बीटमधे येणाऱ्या वन विभागाच्या जागेतील बाभळीच्या झाडांची कत्तल कण्यात आली होती. शिवाय अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचीहीदेखील कत्तल केली जात आहे. आता क्षीरसमुद्र येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे कापण्याचा सपाटा कंत्राटदारांनी लावला आहे. अवैधरित्या होणाऱ्या या वृक्षकत्तलीकडे बांधकाम विभाग, वन विभाग तथा सामाजिक वनिकरणचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आमच्याकडे येत नसल्याचे सांगितले जाते. क्षेत्र सहायक कावळे यांना विचारणा केली असता वृक्ष कुणाच्याही हद्दीत असो, ते वाचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. अवैध वृत्ततोड थांबविली पाहिजे, आम्ही चौकशी करू, असे सांगितले. अवैरित्या वृक्षांची कत्तल करणारी ही टोळी सबंध जिल्हाभर वृक्षतोड करीत असून यातून मलिदा मिळवित असल्याचे दिसते. प्रशासनाने याकडे लक्ष देत वृक्षतोड्यांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)झाडे जाळण्याच्या प्रकारातही वाढजिल्ह्यातील अनेक मार्गांवर झाडे जाळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. उन्हाळ्यात या झाडांना आगी लावण्याचे प्रकार वाढीस लागतात. आग लावल्यानंतर दोन-तीन दिवसांत ते झाड जमिनीवर कोसळते. यानंतर त्या झाडाची रात्रीतूनच विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी दिवसा वृक्षांची कत्तल केली जाते तर कुठे झाडांना आगी लावल्या जातात. या प्रकारांमुळे वृक्षांची संख्या घटत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.