शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतच्या बाभळाची अवैधरित्या कत्तल

By admin | Updated: April 4, 2017 01:22 IST

शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे.

पर्यावरणाला धोका : खाजगी कंत्राटदारांची अरेरावी, प्रशासनाचे दुर्लक्ष झडशी : शासन वृक्षलागवडीवर मोठा खर्च करीत असला तरी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शिवाय वृक्षांवरील खर्चही व्यर्थ ठरत आहे. सध्या येळाकेळी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. झडशी येथून जाणाऱ्या येळाकेळी ते वर्धा मार्गावर क्षीरसमुद्र व अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करणारी टोळी सक्रीय आहे. या टोळक्याद्वारे दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यात बहुतांश बाभूळीची झाडे कापली जात असल्याचे समोर आले आहे. या टोळक्याला अभय कुणाचे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. यापूर्वी झडशी बीटमधे येणाऱ्या वन विभागाच्या जागेतील बाभळीच्या झाडांची कत्तल कण्यात आली होती. शिवाय अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचीहीदेखील कत्तल केली जात आहे. आता क्षीरसमुद्र येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे कापण्याचा सपाटा कंत्राटदारांनी लावला आहे. अवैधरित्या होणाऱ्या या वृक्षकत्तलीकडे बांधकाम विभाग, वन विभाग तथा सामाजिक वनिकरणचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आमच्याकडे येत नसल्याचे सांगितले जाते. क्षेत्र सहायक कावळे यांना विचारणा केली असता वृक्ष कुणाच्याही हद्दीत असो, ते वाचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. अवैध वृत्ततोड थांबविली पाहिजे, आम्ही चौकशी करू, असे सांगितले. अवैरित्या वृक्षांची कत्तल करणारी ही टोळी सबंध जिल्हाभर वृक्षतोड करीत असून यातून मलिदा मिळवित असल्याचे दिसते. प्रशासनाने याकडे लक्ष देत वृक्षतोड्यांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)झाडे जाळण्याच्या प्रकारातही वाढजिल्ह्यातील अनेक मार्गांवर झाडे जाळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. उन्हाळ्यात या झाडांना आगी लावण्याचे प्रकार वाढीस लागतात. आग लावल्यानंतर दोन-तीन दिवसांत ते झाड जमिनीवर कोसळते. यानंतर त्या झाडाची रात्रीतूनच विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी दिवसा वृक्षांची कत्तल केली जाते तर कुठे झाडांना आगी लावल्या जातात. या प्रकारांमुळे वृक्षांची संख्या घटत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.