शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

नाल्यातील मातीचे अवैध उत्खनन

By admin | Updated: May 7, 2014 02:26 IST

तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथे असलेल्या नाल्यातून येथील विटभट्टी मालक उत्खनन करीत आहेत. होत असलेल्या मातीच्या या उत्खननामुळे नाल्याचे पात्र वाढत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी शेतात शिरण्याची भीती; शेतकर्‍यांची तहसीलदारांकडे तक्रार

वर्धा : तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथे असलेल्या नाल्यातून येथील विटभट्टी मालक उत्खनन करीत आहेत. होत असलेल्या मातीच्या या उत्खननामुळे नाल्याचे पात्र वाढत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातील पाणी शेतात जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या संबंधी येथील शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असली तरी त्यांच्याकडून काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात विटभट्टी व्यवसाय जोरात असतो. या व्यावसायिकांना विटांकरिता लागत असलेली माती विकत घ्याची लागते. मात्र वर्धेत ढिसाळ पडलेल्या प्रशासनामुळे सारेच अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. यात वर्धा तालुक्यातही अनेक जण विटभट्टीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून शासनाला कोणताही महसूल मिळत नसून या भट्टीमालकांकडून मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. तालुक्यात येत असलेल्या जंगलव्याप्त भागातील झुडपी जंगलातून मातीचे उत्खनन झाले आहे. यावर वनविभागाने अंकुश लावला असून भट्टी मालकांनी आता त्यांचा मोर्चा नदी नाल्यांकडे वळविला आहे.

खरांगणा (गोडे) येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा करण्यात येत आहे. याची काही शेतकर्‍यांनी वर्धा तहसीलदारांकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे घोव घेतली असली तरी त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात आली नाही. या नाल्यातून होत असलेल्या मातीच्या उत्खननामुळे येत्या दिवसात परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)