शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नजरअंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

सोयाबीन कापणीचा खर्च निघु शकेल एवढाही उतारा नसल्याने अनेकांनी शेतात जनावरे सोडली तर बी.टी. कापूस रोगाला बळी पडत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या बियाणे कंपन्या मुग गिळून आहेत.

फनिंद्र रघाटाटे - रोहणासोयाबीन कापणीचा खर्च निघु शकेल एवढाही उतारा नसल्याने अनेकांनी शेतात जनावरे सोडली तर बी.टी. कापूस रोगाला बळी पडत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या बियाणे कंपन्या मुग गिळून आहेत. कापसावर आलेला लाल्या व पांढऱ्या माशीच्या हल्ल्याने दोन वेच्यात कापसाची उलंगवाडी होणार आहे. अशात जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक काढल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्याची ओरड आहे. शेतात असलेल्या कपाशीच्या पिकावरून सरासरी दोन ते तीन क्विंटल प्रति एकर उतारा मिळण्याची आशा आहे. पेरणीनंतर पावसाने मारलेल्या दडीत तुरीची रोपटे पाखरांनी खाऊन फस्त केलीत. त्यामुळे तुरीचे पीकही पन्नास टक्के घटणार आहे. अशी सर्व परिस्थिती असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्वच भागातील नजर अंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे शासनाला कळवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचे मार्ग बंद केले आहेत. आहे. बी.टी. कापसाची पाती गळत नाही. झाडाला जेवढी पाती येते त्याची बोंडे होतात. फार फवारणीची गरज पडत नाही. झाड उत्पादन क्षम होईपर्यंत बीटीवर कोणताच रोग येत नाही, असे सांगत शेतकऱ्यांना भूरळ पाडण्यात आली. अशात १५ आॅक्टोंबरला झालेल्या पावसापासून कपाशीच्या झाडावरील पाती गळणे सुरू झाले तर आठ दिवसात झाडावर पाती दिसेनासी झाली व लाल्यासह पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावाने कापसाचे पीक लाल आले आहे. पक्व झालेली बोंडे फुटेल तेवढा कापूस घरी येईल त्यातही मजूर कापूस वेचणीसाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत मजुरी मागत आहेत. कापसाला भाव साडेतीन हजार रुपये मिळणार असेल तर एकरी दोन व तीन क्विंटल उत्पन्नात झालेला खर्च कसा निघणार या विवंचनेत बळीराजा आहे. असे असतानाच महसूल विभागाने नजर आणेवारी पन्नास पैश्यापेक्षा अधिक काढल्याची माहिती बाहेर आली अन् शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. शासनाच्या महसूूल विभागाने बसल्याबसल्या आणेवारी काढण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थितीच्या वास्तवतेची जाणीव करून घ्यावी अशी मागणी समस्त शेतकरी करीत आहेत.