शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

नजरअंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

सोयाबीन कापणीचा खर्च निघु शकेल एवढाही उतारा नसल्याने अनेकांनी शेतात जनावरे सोडली तर बी.टी. कापूस रोगाला बळी पडत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या बियाणे कंपन्या मुग गिळून आहेत.

फनिंद्र रघाटाटे - रोहणासोयाबीन कापणीचा खर्च निघु शकेल एवढाही उतारा नसल्याने अनेकांनी शेतात जनावरे सोडली तर बी.टी. कापूस रोगाला बळी पडत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या बियाणे कंपन्या मुग गिळून आहेत. कापसावर आलेला लाल्या व पांढऱ्या माशीच्या हल्ल्याने दोन वेच्यात कापसाची उलंगवाडी होणार आहे. अशात जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक काढल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्याची ओरड आहे. शेतात असलेल्या कपाशीच्या पिकावरून सरासरी दोन ते तीन क्विंटल प्रति एकर उतारा मिळण्याची आशा आहे. पेरणीनंतर पावसाने मारलेल्या दडीत तुरीची रोपटे पाखरांनी खाऊन फस्त केलीत. त्यामुळे तुरीचे पीकही पन्नास टक्के घटणार आहे. अशी सर्व परिस्थिती असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्वच भागातील नजर अंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे शासनाला कळवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचे मार्ग बंद केले आहेत. आहे. बी.टी. कापसाची पाती गळत नाही. झाडाला जेवढी पाती येते त्याची बोंडे होतात. फार फवारणीची गरज पडत नाही. झाड उत्पादन क्षम होईपर्यंत बीटीवर कोणताच रोग येत नाही, असे सांगत शेतकऱ्यांना भूरळ पाडण्यात आली. अशात १५ आॅक्टोंबरला झालेल्या पावसापासून कपाशीच्या झाडावरील पाती गळणे सुरू झाले तर आठ दिवसात झाडावर पाती दिसेनासी झाली व लाल्यासह पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावाने कापसाचे पीक लाल आले आहे. पक्व झालेली बोंडे फुटेल तेवढा कापूस घरी येईल त्यातही मजूर कापूस वेचणीसाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत मजुरी मागत आहेत. कापसाला भाव साडेतीन हजार रुपये मिळणार असेल तर एकरी दोन व तीन क्विंटल उत्पन्नात झालेला खर्च कसा निघणार या विवंचनेत बळीराजा आहे. असे असतानाच महसूल विभागाने नजर आणेवारी पन्नास पैश्यापेक्षा अधिक काढल्याची माहिती बाहेर आली अन् शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. शासनाच्या महसूूल विभागाने बसल्याबसल्या आणेवारी काढण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थितीच्या वास्तवतेची जाणीव करून घ्यावी अशी मागणी समस्त शेतकरी करीत आहेत.