शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

सन्मानने जगायचे असेल तर संघटित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:29 IST

संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार मिळाले तरच कामगार सुखी राहु शकतो. या विचारानेच कामाचे तास आठ तास, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आरोग्य सुविधा महिलाकरिता पगारी प्रसूती किमान वेतन समान कामाला समान वेतन या सारख्या योजना लागू झाल्या.

ठळक मुद्देभरत चंद्रिकापुरे : आयटकतर्फे १ मे कामगारदिनी गोविंद पानसरे पुरस्कार २०१८

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार मिळाले तरच कामगार सुखी राहु शकतो. या विचारानेच कामाचे तास आठ तास, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आरोग्य सुविधा महिलाकरिता पगारी प्रसूती किमान वेतन समान कामाला समान वेतन या सारख्या योजना लागू झाल्या. परंतु कामगारांची भक्कम एकजुट नसल्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारापासून कामगार वंचित राहत आहेत, असे विचार औद्योगिक न्यायालय नागपूरचे सेवानिवृत्त न्यायाधीश भरत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.आयटक व विविध संघटनेच्यावतीने कामगार दिवस व डॉ. गोंविद पानसरे पुरस्कार २०१८ या कार्यक्रमात संविधानाने दिलेले कामगार कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे होते.कामगार दिनी सकाळी प्रथम शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कामगारांचे प्रतीक लालझेंड्यांचे ध्वजारोहन ज्येष्ठ कामगार रामभाऊ दाभेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीर धम्मा खडसे व संजय भगत यांनी विविध गीत सादर करून फसव्या सरकाराची पोल खोल केली.आयटक जिल्हा अध्यक्ष मनोहर पचारे, जिल्हा सचिव वंदना कोळणकर, अंगणवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्ष विजया पावडे, कामगार संघटना सयुंक्त कृती समितीचे गुणवंत डफरे, प्रदीप दाते, आरोग्य कर्मचारी संघटना अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुबंडे, दीपक कांबळे, सुरेश गोसावी, वर्धा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित शेख, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे हरिचंद्र लोखंडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी महासंघाच्या अन्नपुर्णा ढोबळे, विजय जांगडे, सुजाता कांबळे, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, मैना उईके, साहेबराव मुन, वैभव नंदरधने, बादल भालशंकर, दानिश फारुकी, गजेंद्र सुरकार यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. गोंविद पानसरे पुरस्कार २०१८ दरवर्षी प्रमाणे अतिथी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन आयटक जिल्हा संघटक असलम पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार माला भगत यांनी मानले. निलेश साटोणे, आशा पेंदोर, अमित कोपूलवार, संजय डगवार, प्रमोद लकडे, बादल भालशंकर स्वप्नील वेले, जयंता चव्हाण, अरुणा नागोसे, अतुल ठाकरे, अल्का भानसे, माया तितरे, चंदा मेश्राम, कल्पना कांबळे, संघमित्रा तामगाडगे, रंजना डफ, सुजाता बोबडे, माधूरी मुडे, रजनी अलोणे, वैशाली सातपुते, यशपाल डिकोले, रोशन टेभुर्णीकर, पवन ढगे, मोहन वालदे, सचिन तुरनकर, आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.विविध मान्यवरांचा गौरवयंदाच्या वर्षी पुरस्कार पुरस्कार देऊन प्रकाश कथले, रूपेश खैरी, रमेश निमजे, पराग ढोबळे, नरेंद्र मते, चेतन व्यास, रेणुका कोटमकार, रविंद्र कोटमकार, प्रणिता राजूरकर, योगेश कांबळे, संजय बोंडे, विशाल कट्टोजवार, सुरेंद्र रामटेके यांना देण्यात आला. शाल श्रीफळ स्मृती चिन्ह तसेच डॉ. पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक देऊन सदर व्यक्तींना गौरविण्यात आले. तसेच नत्थुजी होलघरे, भाऊराव पोंगले, लक्ष्मण इटनकर, प्रधान काका, मारोतराव इमडवार, हरिदास जवूळकर, राजेश इंगोले यांनाही सन्मानित करण्यात आले.