शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळाल्यास प्राण वाचविता येईल

By admin | Updated: January 15, 2017 00:47 IST

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते.

इंदूरकर : रस्ता सुरक्षा सप्ताह वर्धा : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते. अपघात झाल्यास पहिल्या एक ते दोन तासात जर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली तर अनेक लोकांचे प्राण वाचविणे शक्य होईल, असे प्रतिपादन सामान्य रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. इंदूरकर यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विकास भवन येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील आॅटोरिक्षा, स्कूलबस संघटना यांच्यासाठी रस्ता सुरक्षा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला सामान्य रूग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. कपील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी. झाडे, वाहतूक उपनिरीक्षक कोडापे, बोराडे, अमोल रघाटाटे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. इंदुरकर म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचविण्यास प्राधान्य देण्यात यावे. अशा जखमींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस विभागाकडून चौकशीसाठी बोलविण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर बोलताना डॉ. कपील म्हणाले, रस्ता अपघातामधील ७० टक्के व्यक्ती या डोक्याला मार लागल्यामुळे मृत पावतात. दुचाकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे जीवितहानी निश्चितपणे टाळता येऊ शकेल. यावेळी बोराडे व अमोल रघाटाटे यांनी कॅशलेस व्यवहाराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. पी.पी.टी. द्वारे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी, वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सूरज पवार यांनी केले तर पी.बी. झाडे यांनी आभार मानले.(स्थानिक प्रतिनिधी)