शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

भाषा मृत पावली तर संस्कृतीही नष्ट होते

By admin | Updated: March 3, 2017 01:51 IST

प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पु

पुरूषोत्तम कालभूत : जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन वर्धा : प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पुरवून जिवंत ठेवतात; पण हल्ली बोलीच मृत पावत चालल्या आहेत. जाती-जमातीच्याही बोली नष्ट होताना दिसत आहेत. यामुळे आपण बोली जगविल्या पाहिजेत. बोली भाषा मृत पावल्या तर आपली संस्कृतीही नष्ट होते, असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी केले.शिक्षा मंडळ वर्धाद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात सोमवारी मराठी विभागाद्वारे कवी कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. कालभूत पूढे म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी मराठी भाषेचा उदय झाला. मराठी ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काळात मराठीला सर्वोच्च वैभव प्राप्त झाले होते; पण आता कॉन्व्हेंट संस्कृती फोफावत असल्याने इंग्रजी भाषेचा वापर वाढला आहे. ज्याला इंग्रजी येत नाही, त्याला मागास समजले जाते. यामुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळेच मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल तर आपल्यापासून सुरूवात करा. मराठी बोला आणि बोली जगवा, असे आवाहनही त्यांनी केले.उपप्राचार्य सुरेश पवार यांनी आपली बोली भाषा बोलताना कोणतीही लाज बाळगू नका. सोबतच मराठी ही मातृभाषा आहे, हेही विसरू नका, असे सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. राजेश देशपांडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. यावेळी दिलेश्वरी वर्मा व सारिका तेलगोटे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार प्रा. आनंद इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ. वैशाली उगले व विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)