शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

निरूपयोगी मूर्ती रस्त्याच्या कडेला

By admin | Updated: September 14, 2016 00:48 IST

प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही.

प्लास्टर आॅफ पॅरिसचा खच : कचऱ्यातील मूर्र्तींची विल्हेवाट लावण्याची मागणीवर्धा : प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही. त्यांची होणारी दुरवस्था मानवी काळजाला ठेच पोहोचविणारी आहे. वर्धेतील कुंभार समाजाने प्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर करून मूर्ती तयार केल्या नाही. यामुळे आणि इतर काही कारणांणी निरूपयोगी ठरलेल्या मूर्तींची विल्हेवाट लावण्याकरिता त्या रस्त्याच्या कडेला कचऱ्यात नेऊन टाकण्यात आल्या. यामुळे भाविकांत संतापाची लाट उसळली आहे. सिंदी (मेघे) येथील कुंभारपुऱ्यात सर्व देवी-देवतांच्या मूर्तींची सुबक पद्धतीने निर्मिती करण्यात येते. काही घरांमध्ये मातीपासून तर काहींकडे प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्यांची निर्मिती केली जाते. विकल्या गेलेल्या मूर्ती घरीच सुरक्षितरित्या ठेवल्या जातात. त्यांचीही तुटफूट झाली असेल तर योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे काही वर्षांपूर्वी पाहावयास मिळत होते. आता मात्र मातीच्या मूर्तींची निर्मिती कमी आणि पीओपीच्या मूर्तींची निर्मितीच अधिक होत असल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. गणेश स्थापनेपूर्वी सर्र्वांच्याच घरी पीओपीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. ज्या मूर्ती योग्य पद्धतीने साचातून बाहेर निघाल्या, त्यांची रंगरंगोटी करण्यात आली; पण ज्या मूर्तींमध्ये बिघाड वा इतर काही बाबींची कमतरता आढळली, त्या मूर्तींची रंगरंगोटी न करता त्या अडगळीत ठेवण्यात आल्या. गणेश उत्सवाला प्रारंभ झाला. मूर्त्यांची विक्री आटोपली. आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरू करावयाची असल्याने मूर्तींची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये गणरायाच्या निरूपयोगी मूर्ती बाहेर काढण्यात आलया आहेत. या मूर्तींची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नागठाणा गावाकडे जाणाऱ्या मार्गाच्या कडेला या तुटलेल्या मूर्ती नेऊन कचऱ्यात टाकण्यात आल्या आहेत. नागठाणा मार्गावरील पंचमुखी हनुमान मंदिरापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला तुटलेल्या मूर्तींचा मोठा ढिग पडलेला आहे. शनिवारी सकाळी हा ढिग काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यावेळी अनेकांनी तेथे थांबून त्या मूर्तींची पाहणी करीत ही देवी-देवतांची विडंबणा असल्याचे म्हणत फेकणाऱ्यांविरूद्ध रोष व्यक्त केला. अत्यंत गलिच्छता असलेल्या ठिकाणावर या मूर्ती टाकण्यात आल्याने भाविक दुखावले आहेत. एकीकडे भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे त्याच गणरायाच्या मूर्ती भग्नावस्थेत कचऱ्यात पडून असल्याचे दु:ख व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या मूर्तींचा ढीग उचलून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)