शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम ...

ठळक मुद्देखडकी, सेलू, केळझर, पवनारसह देवळीबाहेरूनच जातात वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम राज्याच्या विविध भागात सुरू आहे. बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्धा जिल्ह्यात पूर्ण झाल्याने या रस्त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांची ओळख आता पुसली गेली आहे.नागपूरवरून यवतमाळकडे निघालेल्या वाहनाला आता खडकी, सेलू, केळझर, सेलडोह, देवळी या गावांचे दर्शनही होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी नागपूर-वर्धा हा डांबरी रस्ता दुहेरी स्वरूपाचा होता. परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तयार करताना जुन्या रस्त्याच्या काठावरील दोन्ही भागातील जमीन मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आली.या रस्त्याबरोबरच समृद्धी महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले. त्याची गती सद्यस्थितीत मंदावलेली आहे.तुळजापूर-बोरी महामार्गामुळे खडकीचे हनुमान मंदिर आता वाहनचालकाच्या लक्षातच येत नाही. पूर्वी येथे नागरिक दर्शनासाठी थांबायचे. मात्र, आता वाहनाचा वेग जुन्यापेक्षा वाढल्याने खडकी कधी गेले, याचा पत्ताच लागत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांची आहे.पवनार, सेलू, केळझर या गावाच्या बाहेरूनच वाहने निघून जात आहेत. सेलू गावातही आता जाण्याची गरज उरलेली नाही. महामार्गावरून सेलू व मदनीसाठीचा मार्ग फलक दिसून येतो. केळझर गावातील वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे गावांची ओळख या महामार्गामुळे संपली, असेच म्हणावे लागेल.दिवाळीनिमित्त नागपूरवरून वर्ध्याला येत असताना खडकी केव्हा आले, हे लक्षातच आले नाही. पूर्वी येथे दर्शन व नाश्त्यासाठी थांबता येत होते. परंतु, यावेळी आम्ही सेलूजवळ आलो. तेव्हा खडकी मागे गेले, हे लक्षात आले. नव्या रस्त्यामुळे खडकी व बरीच गावे लक्षातच येत नाहीत. सेलूबाहेरूनच आम्ही वाहन आणले. त्यामुळे सेलूचा केवळ फलक दिसला.- प्रफुल्ल चाफले, रहिवासी, खारघर,नवी मुंबई

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग