शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम ...

ठळक मुद्देखडकी, सेलू, केळझर, पवनारसह देवळीबाहेरूनच जातात वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम राज्याच्या विविध भागात सुरू आहे. बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्धा जिल्ह्यात पूर्ण झाल्याने या रस्त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांची ओळख आता पुसली गेली आहे.नागपूरवरून यवतमाळकडे निघालेल्या वाहनाला आता खडकी, सेलू, केळझर, सेलडोह, देवळी या गावांचे दर्शनही होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी नागपूर-वर्धा हा डांबरी रस्ता दुहेरी स्वरूपाचा होता. परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तयार करताना जुन्या रस्त्याच्या काठावरील दोन्ही भागातील जमीन मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आली.या रस्त्याबरोबरच समृद्धी महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले. त्याची गती सद्यस्थितीत मंदावलेली आहे.तुळजापूर-बोरी महामार्गामुळे खडकीचे हनुमान मंदिर आता वाहनचालकाच्या लक्षातच येत नाही. पूर्वी येथे नागरिक दर्शनासाठी थांबायचे. मात्र, आता वाहनाचा वेग जुन्यापेक्षा वाढल्याने खडकी कधी गेले, याचा पत्ताच लागत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांची आहे.पवनार, सेलू, केळझर या गावाच्या बाहेरूनच वाहने निघून जात आहेत. सेलू गावातही आता जाण्याची गरज उरलेली नाही. महामार्गावरून सेलू व मदनीसाठीचा मार्ग फलक दिसून येतो. केळझर गावातील वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे गावांची ओळख या महामार्गामुळे संपली, असेच म्हणावे लागेल.दिवाळीनिमित्त नागपूरवरून वर्ध्याला येत असताना खडकी केव्हा आले, हे लक्षातच आले नाही. पूर्वी येथे दर्शन व नाश्त्यासाठी थांबता येत होते. परंतु, यावेळी आम्ही सेलूजवळ आलो. तेव्हा खडकी मागे गेले, हे लक्षात आले. नव्या रस्त्यामुळे खडकी व बरीच गावे लक्षातच येत नाहीत. सेलूबाहेरूनच आम्ही वाहन आणले. त्यामुळे सेलूचा केवळ फलक दिसला.- प्रफुल्ल चाफले, रहिवासी, खारघर,नवी मुंबई

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग