शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या निर्र्मितीमुळे गावांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम ...

ठळक मुद्देखडकी, सेलू, केळझर, पवनारसह देवळीबाहेरूनच जातात वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ते हे विकासाचे महत्वाचे घटक आहेत. सध्या केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम राज्याच्या विविध भागात सुरू आहे. बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्धा जिल्ह्यात पूर्ण झाल्याने या रस्त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांची ओळख आता पुसली गेली आहे.नागपूरवरून यवतमाळकडे निघालेल्या वाहनाला आता खडकी, सेलू, केळझर, सेलडोह, देवळी या गावांचे दर्शनही होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी नागपूर-वर्धा हा डांबरी रस्ता दुहेरी स्वरूपाचा होता. परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तयार करताना जुन्या रस्त्याच्या काठावरील दोन्ही भागातील जमीन मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आली.या रस्त्याबरोबरच समृद्धी महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले. त्याची गती सद्यस्थितीत मंदावलेली आहे.तुळजापूर-बोरी महामार्गामुळे खडकीचे हनुमान मंदिर आता वाहनचालकाच्या लक्षातच येत नाही. पूर्वी येथे नागरिक दर्शनासाठी थांबायचे. मात्र, आता वाहनाचा वेग जुन्यापेक्षा वाढल्याने खडकी कधी गेले, याचा पत्ताच लागत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांची आहे.पवनार, सेलू, केळझर या गावाच्या बाहेरूनच वाहने निघून जात आहेत. सेलू गावातही आता जाण्याची गरज उरलेली नाही. महामार्गावरून सेलू व मदनीसाठीचा मार्ग फलक दिसून येतो. केळझर गावातील वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे गावांची ओळख या महामार्गामुळे संपली, असेच म्हणावे लागेल.दिवाळीनिमित्त नागपूरवरून वर्ध्याला येत असताना खडकी केव्हा आले, हे लक्षातच आले नाही. पूर्वी येथे दर्शन व नाश्त्यासाठी थांबता येत होते. परंतु, यावेळी आम्ही सेलूजवळ आलो. तेव्हा खडकी मागे गेले, हे लक्षात आले. नव्या रस्त्यामुळे खडकी व बरीच गावे लक्षातच येत नाहीत. सेलूबाहेरूनच आम्ही वाहन आणले. त्यामुळे सेलूचा केवळ फलक दिसला.- प्रफुल्ल चाफले, रहिवासी, खारघर,नवी मुंबई

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग