शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उष्णतामानाने व्हायरल फिव्हरच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: April 9, 2015 02:55 IST

सध्या जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागला आहे़ सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेल्याने जीवाची काहिली होत आहे़ ...

पुलगाव : सध्या जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागला आहे़ सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेल्याने जीवाची काहिली होत आहे़ वाढत्या उष्णतामानामुळे ताप, सर्दी, पडसा, खोकला, घसादुखी आदी विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे़ व्हायरल फीव्हरच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे़ वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ वाजेपासून रस्ते भकास होतात़ तापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्री वाढली असून रसवंत्या हाऊसफुल्ल आहे़ रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्याही सुगीचे दिवस अनुभवत आहे़विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा काळ असला तरी पंखे, कुलरच्या गारव्यात युवा मंडळी दुपारी घरीच राहणे पसंत करतात़ वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने टरबूज, अननस, अंगूर, खरबूज यासारख्या पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळांची तसेच काकडी, निंबू, पालेभाज्या यांचीही मागणी बाजारात वाढल्याचे चित्र आहे़ फळांचा राजा आंबासुद्धा बाजारात डेरेदाखल झाला आहे़ १०० ते १४० रुपये किलोप्रमाणे बैंगणफल्ली, हैद्राबादी, लालबाग आंबा उपलब्ध होत असल्याचे दिसून येते़ सध्या बाजारात कार्बाईड रसायनात पिकविलेली फळे विक्रीस आली असून संबंधित यंत्रणेची डोळेझाक होत असल्याचे दिसते़ वाढत्या तापमानात काकडी टरबूज, अंगूर ही फळे वापरल्याने पाण्याची कमतरता भरून काढणे शक्य आहे़ जलजन्य फळांची वाढती मागणी लक्षात घेता बाजारात फळविक्रेते सर्वच प्रकारची फळे विक्रीस ठेवून ग्राहकांची गरज भागवित असल्याचे दिसते़ टरबूज-खरबूज ४० रुपये, अननस ८० ते १०० रुपये प्रती नग, अंगूर १०० रुपये, शहाळे ५० ते ६० रुपये प्रती नग तसेच काकडी ३० ते ४० रुपये प्रती किलो तर पालेभाज्या ३० ते ४० रुपये किलो अशी भाववाढ झाल्याचेही बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले़ कार्बाइडयुक्त सर्वच फळे उपलब्ध असली मगजदार पिवळी टेंभर, आंबटगोड चवीच्या खिरण्या बेपत्ता आहेत़ यामुळे आरोग्याला रानमेवा मिळणे कठीण झाले असून फळांचे खवैय्ये रानमेव्यापासून वंचित झाले आहे़ वाढत्या उन्हामुळे डोक्याला बांधावयाचे दुपट्टे, स्कार्फ, टोप्यांची मागणी वाढली असून लांब हैद्राबादी दुपट्ट्यांचे दर २२५ ते २५० रुपये झाले आहेत़ डोळ्याचे उन्हापासून संरक्षण करणाऱ्या सनगॉगलसची विक्री उन्हामुळे वाढली आहे़ या गॉगल्सच्या आॅनलाईन खरेदीलाही युवामंडळीचा प्रतिसाद मिळत आहे़ वाढत्या उष्णतामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याने अधिक उन्हात जाण्याचे टाळले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ञ व्यक्त करतात़(तालुका प्रतिनिधी)