शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात ४९ गावांतील ८४०० हेक्टर शेतीला बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:58 IST

आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेचे काम विरुळ परिसरात सुरू आहे.

ठळक मुद्दे सूक्ष्म सिंचन योजनाराज्यातील पहिलाच प्रकल्पशेतकऱ्यांकरिता ठरेल वरदान

सचिन देवताळे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेचे काम विरुळ परिसरात सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्वी तालुक्यातील ४९ गावांतील ८ हजार ४०० हेक्टर शेतीला बारमाही सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी मिळणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदानच ठरणार आहे.आर्वी तालुक्यात निम्न वर्धा प्रकल्पाला केवळ एकच कालवा आहे. यामुळे प्रकल्पाजवळील डावीकडील भाग व प्रकल्पाच्या मागील भाग प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहिला हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेली लिप्ट इरिगेशन योजना धूळखात होती. तिला सूक्ष्म सिंचन योजनेत परावर्तित करण्यात आले. या योजनेला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. या योजनेसाठी अंदाजे २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सोबतच ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाकरिता निवडण्यात आले. यासाठी विरुळ, रोहणा, धनोडी, खुबगाव या परिसरातील 49 गावातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी विरुळ परिसरात कामाचा प्रारंभ करण्यात आला असून जैन इरिगेशन अंतर्गत या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, कालवा न खोदता मोठे लोखंडी पाईप टाकून पाणी शेतापर्यंत पोहोचविले जाणार आहे. यासाठी जेसीबीने नाल्या खोदून त्यामध्ये मोठमोठ्या जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पाशेजारी लवकरच पंपिग स्टेशनचे काम सुरू होणार आहे. शेजारीच विद्युत पॉवर स्टेशनही निर्माण होणार आहे. जून २०२० पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील पहिलाच प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात राबविला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संबंधित विभागाकडून प्रत्येक कामाची माहिती घेतली जात आहे. वर्धा जिल्ह्याच्या धर्तीवर इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जाणार आहे.ड्रिप व तुषार सिंचनाद्वारे पाणीप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला ड्रिप व तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.त्याकरिता प्रत्येक शेतात पाणी पुरवठ्याची स्वतंत्र योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या सूक्ष्म सिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्याकरिता स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणाही उभारली जाणार आहे. राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित असून या भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या प्रकल्पाचे काम जैन इरिगेशन, जळगाव कंपनी करणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेतच पूर्ण करायचे आहे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांचेही योग्य सहकार्य मिळत आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.- पवळ गहिणीनाथप्रकल्प व्यवस्थापक,जैन इरिगेशन, जळगाव.

टॅग्स :agricultureशेती