शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहनांना हिरवा रंग

By admin | Updated: September 16, 2016 02:54 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण

वर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण करण्यात येणार आहे. याकरिता लागणारी वाहने एकाच रंगाची राहणार आहे. धान्याचा पुरवठा करणारी ही वाहने हिरव रंगाची राहणार आहे. या एकाच रंगामुळे सामान्य नागरिकांनाही ही वाहने ओळखणे शक्य झाले होणार असून यात होणाऱ्या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंकींग करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख ५७ हजार ४५ शिधापत्रिका धारक आहे. यामध्ये ६५ टक्के आधार लिकींग झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ घेणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य गटामध्ये ८ लाख ८२ हजार ३६७ लाभार्थी असून यातील ९५ टक्के लाभार्थ्यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहेत. याशिवाय राज्यशासनाने सर्व शेतकऱ्यांना स्वस्त दराने धान्य वितरण सुरू केले असून अशा शेतकऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ९१६ एवढी आहे. या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्यात येते. भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्वस्त धान्य दुकानदार या प्रवासात होणारी धान्याची चोरी थांबविण्यासाठी जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्य पोहचविण्यासाठी ३४ वाहने वापरण्यात येत आहेत. तर राज्य शासनाने गोदाम ते रास्तभाव दुकानांमार्फत ७८ वाहनांमार्फत धान्य पोहचविण्यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्यासाठी हिरव्या रंगाने रंगवण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘सुधारित धान्य वितरण प्रणाली, महाराष्ट्र शासन’ असा फलक वाहनाच्या समोरील भागावर लावण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी उतरत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर सामान्य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल, असे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)