शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतच्या गैरव्यवहारावर आता फौजदारी गुन्हे

By admin | Updated: August 14, 2014 00:00 IST

ग्रामपंचायतीच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यास जबाबदार असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गौरव देशमुख - वायगाव (नि़)ग्रामपंचायतीच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यास जबाबदार असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरप्रकाराच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याने सदर अध्यादेश पारित करण्यात आला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार असून वेळोवेळी अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विधी मंडळाच्या पंचायतराज समितीने राज्यभर नुकत्याच केलेल्या दौऱ्यात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. समितीने तसा अहवालही शासनाकडे सादर केला होता. या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी अहवाल शासनाकडे पाठवावा लागणार आहे. यात गैरव्यवहार आढळल्यास ग्रामपंचायती विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार मालमत्ता व रकमेची वसुलीसुद्धा केली जाणार आहे. ग्रामपंचायतीची मालमत्ता, निधीचा अपहार आदी प्रकारांमध्ये दोषी असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच संबंधित कर्मचाऱ्यांविरूद्ध खटला दाखल करण्यात येऊ शकतो, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे तातडीने दाखल करून घेण्याचेही आदेशित करण्यात आले आहे़ सरपंच, उपसरपंच व अन्य संबंधित कर्मचाऱ्यांची मुदत समाप्त होण्यापूर्वी वा समाप्तीनंतर त्यांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे; मात्र त्याच्यावर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचे गुन्हे तातडीने दाखल करणे गरजेचे आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रा़पं़ च्या कामांमध्ये पारदर्शकता येऊन शासन अनुदानातील गैरप्रकाराला आळा घालणे शक्य होणार आहे़