शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

ग्रामपंचायतच्या गैरव्यवहारावर आता फौजदारी गुन्हे

By admin | Updated: August 14, 2014 00:00 IST

ग्रामपंचायतीच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यास जबाबदार असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गौरव देशमुख - वायगाव (नि़)ग्रामपंचायतीच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यास जबाबदार असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरप्रकाराच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याने सदर अध्यादेश पारित करण्यात आला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार असून वेळोवेळी अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विधी मंडळाच्या पंचायतराज समितीने राज्यभर नुकत्याच केलेल्या दौऱ्यात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. समितीने तसा अहवालही शासनाकडे सादर केला होता. या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी अहवाल शासनाकडे पाठवावा लागणार आहे. यात गैरव्यवहार आढळल्यास ग्रामपंचायती विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार मालमत्ता व रकमेची वसुलीसुद्धा केली जाणार आहे. ग्रामपंचायतीची मालमत्ता, निधीचा अपहार आदी प्रकारांमध्ये दोषी असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच संबंधित कर्मचाऱ्यांविरूद्ध खटला दाखल करण्यात येऊ शकतो, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे तातडीने दाखल करून घेण्याचेही आदेशित करण्यात आले आहे़ सरपंच, उपसरपंच व अन्य संबंधित कर्मचाऱ्यांची मुदत समाप्त होण्यापूर्वी वा समाप्तीनंतर त्यांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे; मात्र त्याच्यावर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचे गुन्हे तातडीने दाखल करणे गरजेचे आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रा़पं़ च्या कामांमध्ये पारदर्शकता येऊन शासन अनुदानातील गैरप्रकाराला आळा घालणे शक्य होणार आहे़