शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

ग्रामपंचायतींनी बँकडेटमध्ये दिली बांधकामांना परवानगी

By admin | Updated: May 29, 2015 01:54 IST

शहरालगतच्या अकरा गावांत गत चार वर्षांपासून बांधकाम परवानगी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वर्धा : शहरालगतच्या अकरा गावांत गत चार वर्षांपासून बांधकाम परवानगी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी बॅकडेटमध्ये परवानगी देण्यात आली असून आरटीआय कायद्यांतर्गत माहिती देण्यासही चालढकल केली जात असल्याचा आरोप प्रमोद मुरारका यांनी केला. गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते.बांधकामास परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा करताना दप्तरदिरंगाईचा अनुभव आला असून अद्यापही बांधकामास परवानगी मिळालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. न्यायालयानेही चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते; पण या प्रकरणाची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याच अनुषंगाने वर्धा पंचायत समितीमध्ये माहिती अधिकारांतर्गत २०१० ते २०१५ पर्यंतच्या कालावधीत या ग्रामपंचायतींतर्गत बांधकाम परवानगीसाठी किती अर्ज आलेत आणि किती बांधकामांना परवानगी देण्यात आली, याबाबत माहिती मागितली; पण त्यामध्ये काही ग्रामपंचायतींनी २०११ पर्यंतची माहिती देत काही ग्रामपंचायतींनी आवक नोंदींची माहितीच उपलब्ध करून दिली नाही.पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), चितोडा, म्हसाळा या ग्रामपंचायतींनी अर्धवटच माहिती उपलब्ध करून दिली आहे. यातील बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीने आवक नोंदीच्या प्रमाणीत प्रती उपलब्ध करून दिल्या नाहीत. २०११ च्या पुढील माहिती दिली जात नसल्याने यात नक्कीच काही तरी दडले असल्याचा संशय मुरारका यांनी व्यक्त केला. बॅकडेटमध्ये नोंदी, सरपंच, सचिवाच्या स्वाक्षरीविनाच परवानगीपत्रे शहरालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यांना बॅकडेटमध्ये परवानगी देण्यात आल्याचे निदर्शनास येत असल्याचे मुरारका यांनी सांगितले. सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंच, सचिवाची स्वाक्षरी नसतानाही परवानगी पत्राचे वितरण करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावरून मुरारका यांनी केला. अनुक्रमणिकेचे पोटभाग होत नसतानाही पोटभाग करून परवानगीसाठी नावे घुसडण्यात आल्याचा आरोपही मुरारका यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली.(कार्यालय प्रतिनिधी)अकरा गावांतील बांधकाम परवानगीचा प्रश्न सुटण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते. ग्रामपंचायतींकडून अद्यापही बांधकामास परवानगी देण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. याबाबत ग्रामपंचायतींच्या सचिवांना विचारणा केली असता, आदेश मिळाले नसल्याचे उत्तर मिळते. ग्रामपंचायतींना आदेशाची प्रतीक्षा असल्याने त्यांना याबाबतचे आदेश कधी आणि कोण देणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.नागरिकांचेही लागलेय लक्षअकरा गावांतील बांधकाम परवानगीचा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. आठ दिवसांत प्रश्न सुटणार, दोन महिन्यांत कारवाई सुरू होणार, अशा अनेक अफवा पसरविल्या जात आहेत; पण प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना आदेश मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. यामुळे सभोवतालच्या अकरा ग्रामपंचातींमध्ये बांधकामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसते. बांधकाम परवानगी देण्यावर बंदी घातली असताना इमारती उभारल्या जात असल्यानेही या प्रश्नाकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.