शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी बँकडेटमध्ये दिली बांधकामांना परवानगी

By admin | Updated: May 29, 2015 01:54 IST

शहरालगतच्या अकरा गावांत गत चार वर्षांपासून बांधकाम परवानगी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वर्धा : शहरालगतच्या अकरा गावांत गत चार वर्षांपासून बांधकाम परवानगी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी बॅकडेटमध्ये परवानगी देण्यात आली असून आरटीआय कायद्यांतर्गत माहिती देण्यासही चालढकल केली जात असल्याचा आरोप प्रमोद मुरारका यांनी केला. गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते.बांधकामास परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा करताना दप्तरदिरंगाईचा अनुभव आला असून अद्यापही बांधकामास परवानगी मिळालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. न्यायालयानेही चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते; पण या प्रकरणाची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याच अनुषंगाने वर्धा पंचायत समितीमध्ये माहिती अधिकारांतर्गत २०१० ते २०१५ पर्यंतच्या कालावधीत या ग्रामपंचायतींतर्गत बांधकाम परवानगीसाठी किती अर्ज आलेत आणि किती बांधकामांना परवानगी देण्यात आली, याबाबत माहिती मागितली; पण त्यामध्ये काही ग्रामपंचायतींनी २०११ पर्यंतची माहिती देत काही ग्रामपंचायतींनी आवक नोंदींची माहितीच उपलब्ध करून दिली नाही.पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), चितोडा, म्हसाळा या ग्रामपंचायतींनी अर्धवटच माहिती उपलब्ध करून दिली आहे. यातील बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीने आवक नोंदीच्या प्रमाणीत प्रती उपलब्ध करून दिल्या नाहीत. २०११ च्या पुढील माहिती दिली जात नसल्याने यात नक्कीच काही तरी दडले असल्याचा संशय मुरारका यांनी व्यक्त केला. बॅकडेटमध्ये नोंदी, सरपंच, सचिवाच्या स्वाक्षरीविनाच परवानगीपत्रे शहरालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यांना बॅकडेटमध्ये परवानगी देण्यात आल्याचे निदर्शनास येत असल्याचे मुरारका यांनी सांगितले. सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंच, सचिवाची स्वाक्षरी नसतानाही परवानगी पत्राचे वितरण करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावरून मुरारका यांनी केला. अनुक्रमणिकेचे पोटभाग होत नसतानाही पोटभाग करून परवानगीसाठी नावे घुसडण्यात आल्याचा आरोपही मुरारका यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली.(कार्यालय प्रतिनिधी)अकरा गावांतील बांधकाम परवानगीचा प्रश्न सुटण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते. ग्रामपंचायतींकडून अद्यापही बांधकामास परवानगी देण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. याबाबत ग्रामपंचायतींच्या सचिवांना विचारणा केली असता, आदेश मिळाले नसल्याचे उत्तर मिळते. ग्रामपंचायतींना आदेशाची प्रतीक्षा असल्याने त्यांना याबाबतचे आदेश कधी आणि कोण देणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.नागरिकांचेही लागलेय लक्षअकरा गावांतील बांधकाम परवानगीचा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. आठ दिवसांत प्रश्न सुटणार, दोन महिन्यांत कारवाई सुरू होणार, अशा अनेक अफवा पसरविल्या जात आहेत; पण प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना आदेश मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. यामुळे सभोवतालच्या अकरा ग्रामपंचातींमध्ये बांधकामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसते. बांधकाम परवानगी देण्यावर बंदी घातली असताना इमारती उभारल्या जात असल्यानेही या प्रश्नाकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.