शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

बांधकाम परवानगी देण्यास ग्रामपंचायत सक्षम

By admin | Updated: April 10, 2015 01:43 IST

प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांना त्यांच्या ले-आऊटमधील बांधकामाच्या परवनगीचा अर्ज व बांधकामाला मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास नालवाडी ग्रामपंचायत सक्षम आहे.

वर्धा : प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांना त्यांच्या ले-आऊटमधील बांधकामाच्या परवनगीचा अर्ज व बांधकामाला मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास नालवाडी ग्रामपंचायत सक्षम आहे. सदर प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिलेल्या एका निर्देशावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील बांधकामांवर मागील सुमारे तीन वर्षांपासून बंदी असल्याचे भासवून त्यावर लोकप्रतिनिधी आपली राजकीय पोळी शेकत आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील बांधकामाचा मार्ग सुकर झाला, असे फलकही शहरात झळकले; मात्र नागपूर खंडपीठाच्या उपरोक्त आदेशानुसार बांधकामाचा अधिकार नालवाडी ग्रामपंचातीला असल्याचे दिसून येते. यावरुन इतरही १० ग्रामपंचायतींमध्ये याच धर्तीवर बांधकामाला परवानगी देण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीलाच असल्याचे नाकारता येत नाही. ही बाब आपल्या भुखंडावर घराचे स्वप्न बाळगून असणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते. प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांचे स्वत:च्या जागेवरील अकृषक ले-आऊट नालवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बॅचलर रोडला लागून आहे. त्या ले-आऊटमधील भुखंडावरील बांधकामाकरिता सक्षम आर्किटेक यांनी काढलेले नकाशे व मंजुरीचा प्रस्ताव मुरारका यांनी ग्रामपंचायत नालवाडी येथे १ आॅगस्ट २०१३ आणि १४ फेब्रुवारी २०१४ रोजी सचिवाकडे सादर केला होता. त्यावर सचिवाने मुरारका यांना दिलेल्या पत्रानुसार नालवाडी ग्रामपंचायत बांधकामास मंजुरी देण्यास सक्षम नसल्याचे म्हटले होते. परिणामी मुरारका यांचा प्रस्ताव कोणताही निर्णय न घेता विचाराधिन ठेवण्यात आला. गटविकास अधिकारी यांनीसुद्धा वेळोवेळी अर्ज देऊनसुद्धा त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. या विषयी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगर रचनाकार यांनीही अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही. उल्लखेनीय, नालवाडी ग्रामपंचायतीकडे बांधकामाच्या मंजुरीचे असंख्य प्रस्ताव आजही कार्यवाहीविना केवळ विचाराधिन आहेत. ग्रामपंचायत याबाबत निर्णय घेण्यास सक्षम नाही, असे कारण पुढे करण्यात येत आहे. यावरुन मुरारका यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सचिव ग्रामपंचायत नालवाडी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्या. वासंती नाईक व ए. एम. बडर यांच्या न्यायालयाने याबाबत नालवाडी ग्रामपंचायत बांधकामाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे निर्देश सोमवारी दिले. तसेच मुरारका यांनी दाखल केलेल्या बांधकाम प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घ्यावा, असेही निर्देशीत केले आहे, अशी माहिती मुरारका यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने कायदा पारीत केल्यानंतरही ग्रामपंचायत नालवाडी तसेच शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या बांधकाम मंजुरीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेण्याचे आडमुठे धोरण स्वीकारले आहे. न्यायालयाच्या उपरोक्त निर्णयाने ही बाब आता स्पष्ट झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)