शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नागरिकांच्या ठेवी परत करणे शासनाची जबाबदारी

By admin | Updated: May 29, 2014 02:44 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १00 वर्षांचा इतिहास असताना ती बंद करून अवसायक नियुक्त करण्याचे

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १00 वर्षांचा इतिहास असताना ती बंद करून अवसायक नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेत. या आदेशामुळे सर्वसामान्य ठेवीदार, नागरी व ग्रामीण पतसंस्था, कर्मचारी पतसंस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. या ठेवी परत करण्याची जबाबदारी शासनाची असून त्या परत कराव्यात, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

राष्ट्रीयकृत बँका अस्तित्वात नव्हत्या तेव्हापासून जिल्हा सहकारी बँका राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या नियंत्रणांत सुरू आहेत. सहकारातून सर्वांंगिण विकास व्हावा म्हणून राज्य शासनाने प्रारंभापासूनच सर्व पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आदींचे खाते मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडावे, असे लेखी निर्देशच सहकार विभागाद्वारे दिले जात होते. त्या अनुषंगाने खाते उघडून रकमा जमा करण्यासह मुदत ठेवी ठेवल्या जात होत्या. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना फेडरेशनमध्ये विकलेल्या कापसाचे पैसेही सहकारी बँकेतून अदा होत होते. यामुळे राज्यभरातील शेतकरी सहकारी बँकेशी जुळला. पीक कर्ज, शेत, विहिरी, ट्रॅक्टर आदींकरिता सहकारी बँक कर्ज देत होती. यामुळे सर्वसामान्य खातेदार शेतकरी राज्य शासनाची सहकारी बँक म्हणून विश्‍वास ठेवून होता. शासनाद्वारे खास सहकार मंत्रालय या बँकांसाठी तयार करण्यात आले; पण गत काही वर्षांंत मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे राज्य शासनाने या बँकांच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केले. परिणामी, सदर बँका डबघाईस आल्या. आता शासन जबाबदारी झटकत असल्याने किसान सभेने फिक्स डिपॉझीट, मासिक बचत ठेव, सेव्हींग खात्यात रकमा अडलेल्या ६८ खातेदारांचे निवेदन सहकार आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. शासनाने याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)