शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

नागरिकांच्या ठेवी परत करणे शासनाची जबाबदारी

By admin | Updated: May 29, 2014 02:44 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १00 वर्षांचा इतिहास असताना ती बंद करून अवसायक नियुक्त करण्याचे

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १00 वर्षांचा इतिहास असताना ती बंद करून अवसायक नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेत. या आदेशामुळे सर्वसामान्य ठेवीदार, नागरी व ग्रामीण पतसंस्था, कर्मचारी पतसंस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. या ठेवी परत करण्याची जबाबदारी शासनाची असून त्या परत कराव्यात, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

राष्ट्रीयकृत बँका अस्तित्वात नव्हत्या तेव्हापासून जिल्हा सहकारी बँका राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या नियंत्रणांत सुरू आहेत. सहकारातून सर्वांंगिण विकास व्हावा म्हणून राज्य शासनाने प्रारंभापासूनच सर्व पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आदींचे खाते मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडावे, असे लेखी निर्देशच सहकार विभागाद्वारे दिले जात होते. त्या अनुषंगाने खाते उघडून रकमा जमा करण्यासह मुदत ठेवी ठेवल्या जात होत्या. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना फेडरेशनमध्ये विकलेल्या कापसाचे पैसेही सहकारी बँकेतून अदा होत होते. यामुळे राज्यभरातील शेतकरी सहकारी बँकेशी जुळला. पीक कर्ज, शेत, विहिरी, ट्रॅक्टर आदींकरिता सहकारी बँक कर्ज देत होती. यामुळे सर्वसामान्य खातेदार शेतकरी राज्य शासनाची सहकारी बँक म्हणून विश्‍वास ठेवून होता. शासनाद्वारे खास सहकार मंत्रालय या बँकांसाठी तयार करण्यात आले; पण गत काही वर्षांंत मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे राज्य शासनाने या बँकांच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केले. परिणामी, सदर बँका डबघाईस आल्या. आता शासन जबाबदारी झटकत असल्याने किसान सभेने फिक्स डिपॉझीट, मासिक बचत ठेव, सेव्हींग खात्यात रकमा अडलेल्या ६८ खातेदारांचे निवेदन सहकार आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. शासनाने याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)