शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीसाठी शासनाने मदत करावी

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

मागील वर्षी पावसाचे थैमान तर यावर्षी पावसाची दडी अशा परस्पराविरूद्ध परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिना अर्धा झाल्यावर पावसाने आता हजेरी लावली. शेतकऱ्यावर

शेतकरी वर्गाची अपेक्षा : बळीराजावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकटदारोडा : मागील वर्षी पावसाचे थैमान तर यावर्षी पावसाची दडी अशा परस्पराविरूद्ध परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिना अर्धा झाल्यावर पावसाने आता हजेरी लावली. शेतकऱ्यावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी शासनाकडे करीत आहे. मध्यंतरी एक दिवस पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. बळीराजाने पेरणीला सुरूवात केली. पण कपाशीचे अंकुर वर येताच पावसाने दडी मारली. आजतागायत ती दडी कायम होती. त्यामुळे कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकट आलेच पण सिंचनाची सोय असलेल्यांचेही भरानियमनाने कंबरडे मोडले. त्यांच्यावरही दुबार पेरणीची पाळी आली. कपाशी, सोयाबीन, तूर अंकुर येवून आपल्या मातेच्या कुशीतच त्यांना गुदमरून गेले.आधीच बळीराजाने पेरणीसाठी घरचे पशू धन, सोने विकून बी-बियाणे खरेदी केले. पण ते सर्व वाया गेले. आता दुसरे आणायचे कसे या विवंचनेत बळीराजाची झोप उडाली. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यातच भर म्हणून भारनियमनाने त्रस्त केले आहे. याचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे. परंतु या पेरणीसाठी बळीराजाजवळ दमडीही शिल्लक नाही. तेव्हा शासनाने ही परिस्थिती समजून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सर्वत्र बळीराजाने केली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रामध्ये तिनही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुले पुन्हा एकदा विदर्भातील बळीराजा हवालदिल झाला असून तो अस्मानी संकटात सापडलेला आहेत.राज्यामध्ये सर्वत्र हिच परिस्थिती दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा, वडनेर, फुकटा, आजनसरा अशा २० गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या शंभर टक्के झाल्या असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यातच मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न दत्त म्हणून उभा आहे. त्यामुळे शासनाने सरसकट बळीराजाला मदत देण्याची मागणी अनेक संघटना व शेतकरी करीत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज भासत आहे.(वार्ताहर)