शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पेरणीसाठी शासनाने मदत करावी

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

मागील वर्षी पावसाचे थैमान तर यावर्षी पावसाची दडी अशा परस्पराविरूद्ध परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिना अर्धा झाल्यावर पावसाने आता हजेरी लावली. शेतकऱ्यावर

शेतकरी वर्गाची अपेक्षा : बळीराजावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकटदारोडा : मागील वर्षी पावसाचे थैमान तर यावर्षी पावसाची दडी अशा परस्पराविरूद्ध परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिना अर्धा झाल्यावर पावसाने आता हजेरी लावली. शेतकऱ्यावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी शासनाकडे करीत आहे. मध्यंतरी एक दिवस पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. बळीराजाने पेरणीला सुरूवात केली. पण कपाशीचे अंकुर वर येताच पावसाने दडी मारली. आजतागायत ती दडी कायम होती. त्यामुळे कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकट आलेच पण सिंचनाची सोय असलेल्यांचेही भरानियमनाने कंबरडे मोडले. त्यांच्यावरही दुबार पेरणीची पाळी आली. कपाशी, सोयाबीन, तूर अंकुर येवून आपल्या मातेच्या कुशीतच त्यांना गुदमरून गेले.आधीच बळीराजाने पेरणीसाठी घरचे पशू धन, सोने विकून बी-बियाणे खरेदी केले. पण ते सर्व वाया गेले. आता दुसरे आणायचे कसे या विवंचनेत बळीराजाची झोप उडाली. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यातच भर म्हणून भारनियमनाने त्रस्त केले आहे. याचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे. परंतु या पेरणीसाठी बळीराजाजवळ दमडीही शिल्लक नाही. तेव्हा शासनाने ही परिस्थिती समजून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सर्वत्र बळीराजाने केली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रामध्ये तिनही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुले पुन्हा एकदा विदर्भातील बळीराजा हवालदिल झाला असून तो अस्मानी संकटात सापडलेला आहेत.राज्यामध्ये सर्वत्र हिच परिस्थिती दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा, वडनेर, फुकटा, आजनसरा अशा २० गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या शंभर टक्के झाल्या असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यातच मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न दत्त म्हणून उभा आहे. त्यामुळे शासनाने सरसकट बळीराजाला मदत देण्याची मागणी अनेक संघटना व शेतकरी करीत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज भासत आहे.(वार्ताहर)