शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

तूर उत्पादकांना शासनाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:12 IST

तुरीचा पेरा करताना बहुतांश शेतकरी कपाशीच्या दोन ओळी नंतर एक ओळ या पद्धतीने लागवड करतात. यामुळे पेरेपत्रकावर तुरीचा उल्लेख करताना टक्केवारीच्या स्वरूपात केला जातो.

ठळक मुद्देउत्पादन क्षेत्राची मर्यादा हटली : खरेदीदरम्यान होणार एकराचा उल्लेख; खरेदी करतानाचीही अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तुरीचा पेरा करताना बहुतांश शेतकरी कपाशीच्या दोन ओळी नंतर एक ओळ या पद्धतीने लागवड करतात. यामुळे पेरेपत्रकावर तुरीचा उल्लेख करताना टक्केवारीच्या स्वरूपात केला जातो. यात विक्रीकरिता बाजारात आल्यानंतर उत्पादनाच्या वजनावरून त्याची विक्री करताना अनेक अडचणी निर्माण होतात. ही अडचण आता दूर झाली असून तुरीचा उल्लेख एकराच्या हिशेबाने होणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पणन मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ शेतकरीच नाही तर खरेदी करणाऱ्या यंत्रणेचीही अडचण दूर झाली आहे. खरेदी करताना पेरीपत्रकावरील उल्लेखानुसार शेतकऱ्याचे उतपादन कमी अधिक होत होते. यात कमी उत्पादन झाल्यास अडचण येत नव्हती; मात्र अधिक उत्पादन झाल्यास खरेदी दरम्यान अडचणी येत होत्या. आता नव्या निर्णयानुसार या अडचणी दूर झाल्या असून त्याचा लाभ शेतकºयांसह खरेदी करणाऱ्या शासकीय यंत्रणेलाही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या अटीमुळे जिल्ह्यात झालेले संपूर्ण उत्पादन खरेदी करण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ग्रेडरची समस्या मार्गी लागली असून जिल्ह्यातील सातही केंद्रावर लवकरच खरेदी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.ग्रेडरची समस्या मार्गी; पण धोका कायमनाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत ग्रेडरच्या अनुपस्थितीत खरेदी सुरू होती. खरेदी नंतर पत्रावर ग्रेडरची स्वाक्षरी करून ती तूर समोर पाठविल्या जाणार होती. तुर्तास ही समस्या मार्गी लागली आहे. सातही केंद्रात ग्रेडर आले आहे. आलेले ग्रेडर हे नाफेडचे नसून मार्केटींग फेडरेशनचे आहेत. त्यांनी पास केलेली तूर वखार महामंडळात नाफेडच्या ग्रेडरकरून तपासण्यात येणार आहे. येथे जर या तुरीत गडबड असल्यास ती परत येण्याचा धोका कायम आहे.आर्वीत नाफेडला मिळाली पाच दिवसात १२ क्विंटल तूरआर्वी- नाफेडच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदी सुरू केली आहे. यातील पाच केंद्र सुरू झाले आहे. या पाच केंद्रात आर्वीचे केंद्र असून या केंद्रावर पाच दिवसात केवळ १२ क्विंटल तूर आल्याचे दिसून आले आहे. याला नाफेडच्यावतीने खरेदी दरम्यान लादलेल्या जाचक अटी एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आॅन लाईन पध्दतीने तूर विक्रीची नोंदणी केली आहे. असे खरेदी विक्री संघातर्फे दररोज फक्त १० शेतकऱ्यांना तुरीचे नमुने आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. १०० ग्राम तुरी मोजुन त्यामधून तुरीचा ओलावा १२ टक्के, खराब दाणे ३ टक्के, फुटलेली तूर ३ टक्के असे प्रमाण असल्यासच तुरीची खरेदी करण्यात येते. खरेदीच्या वेळी चाळणी सुध्दा मारण्यात येते. यावर्षी तुरीच्या पिकावर व्हायरस आल्याने तूर भरली नाही. त्यामुळे शेगां अर्धवटच भरल्या. परिणामी तुरीच्या पिकात प्रचंड घट झाली आहे. त्यात खुल्या बाजारात तुरीचे दर ४,३०० ते ४,४०० रुपये आहे. मात्र असलेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना शासकीय दरापासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदी करताना असलेल्या जाचक अटी दूर कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.