शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

शांतीपूर्ण विश्वाच्या निर्मितीकरिता वैश्विक पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देरमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती : जय जगत यात्रा गुरुवारी सेवाग्रामात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्याचा संकल्प घेऊन गरीबी निर्मूलन, हिंसामुक्तीकरिता २ ऑक्टोंबर २०१९ रोजी दिल्ली येथून निघालेली जय जगत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप ३० रोजी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत होणार असल्याची माहिती रमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली.रमेश शर्मा पुढे म्हणाले, बा-बापू यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त एकता परिषदेचे संस्थापक डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा या वैश्विक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेत १० देशातील ५० पदयात्री गांधीजींचा संदेश जगात पोहचविण्याचे काम करीत आहेत.जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे. भारतातील पदयात्रेचे पहिले चरण सेवाग्राम आश्रमात पूर्ण होणार असून त्यानंतर विदेशात ही यात्रा रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.२५ रोजी पदयात्रा अग्निहोत्री महाविद्यालयाच्या परिसरात दाखल होईल. २६ रोजी आतंरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठात पोहचेल तेथे चार दिवस २९ रोजीपर्यंत शांतीयात्रेचे महत्व पटवून देण्यात येईल. तसेच मार्गदर्शन करण्यात येईल. ३० रोजी हिंदी विश्वविद्यालयातून पदयात्रा निघून सेवाग्राम येथील आश्रमात पोहचेल. सेवाग्राम येथील संमेलनात छत्तीसगढचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षा नाना पटोले, छत्तीसगढचे अध्यक्ष आदी उपस्थित राहतील.त्यानंतर ही यात्रा ईरानमार्गे १० देशातून प्रवास करीत २ ऑक्टोबर २०२० ला जिनेवा येथे पोहचणार आहे. यात जगभरातून पाच हजार पदयात्रींचा सहभाग राहणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारांशी संवाद साधताना योगेश मथुरीया यांनी सांगितले की, पदयात्रेत सहभागी विदेशी नागरिकांनी आपले घरदार सोडून सहभाग घेतला आहे. यात्रेत १५ विदेशी महिलांचाही सहभाग आहे.महाराष्ट्रातून सेवाग्राम येथील जलांधरभाई आणि रमेश मिश्रा हे यात्रेत सहभागी झालेले आहेत. नव्या लोकांना, युवकांना जोडण्यासाठी तसेच शांती अहिंसेचा संदेश घेवून ही जय जगत पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी