शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शांतीपूर्ण विश्वाच्या निर्मितीकरिता वैश्विक पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देरमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती : जय जगत यात्रा गुरुवारी सेवाग्रामात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्याचा संकल्प घेऊन गरीबी निर्मूलन, हिंसामुक्तीकरिता २ ऑक्टोंबर २०१९ रोजी दिल्ली येथून निघालेली जय जगत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप ३० रोजी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत होणार असल्याची माहिती रमेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली.रमेश शर्मा पुढे म्हणाले, बा-बापू यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त एकता परिषदेचे संस्थापक डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा या वैश्विक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेत १० देशातील ५० पदयात्री गांधीजींचा संदेश जगात पोहचविण्याचे काम करीत आहेत.जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना बंदी घालून प्राकृतीक वातावरण स्वास्थपूर्ण बनविण्याकरिता ही पदयात्रा काढण्यात आली आहे. भारतातील पदयात्रेचे पहिले चरण सेवाग्राम आश्रमात पूर्ण होणार असून त्यानंतर विदेशात ही यात्रा रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.२५ रोजी पदयात्रा अग्निहोत्री महाविद्यालयाच्या परिसरात दाखल होईल. २६ रोजी आतंरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठात पोहचेल तेथे चार दिवस २९ रोजीपर्यंत शांतीयात्रेचे महत्व पटवून देण्यात येईल. तसेच मार्गदर्शन करण्यात येईल. ३० रोजी हिंदी विश्वविद्यालयातून पदयात्रा निघून सेवाग्राम येथील आश्रमात पोहचेल. सेवाग्राम येथील संमेलनात छत्तीसगढचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षा नाना पटोले, छत्तीसगढचे अध्यक्ष आदी उपस्थित राहतील.त्यानंतर ही यात्रा ईरानमार्गे १० देशातून प्रवास करीत २ ऑक्टोबर २०२० ला जिनेवा येथे पोहचणार आहे. यात जगभरातून पाच हजार पदयात्रींचा सहभाग राहणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारांशी संवाद साधताना योगेश मथुरीया यांनी सांगितले की, पदयात्रेत सहभागी विदेशी नागरिकांनी आपले घरदार सोडून सहभाग घेतला आहे. यात्रेत १५ विदेशी महिलांचाही सहभाग आहे.महाराष्ट्रातून सेवाग्राम येथील जलांधरभाई आणि रमेश मिश्रा हे यात्रेत सहभागी झालेले आहेत. नव्या लोकांना, युवकांना जोडण्यासाठी तसेच शांती अहिंसेचा संदेश घेवून ही जय जगत पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी