शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

संगणकीकृतऐवजी हस्तलिखित सात-बारा द्या

By admin | Updated: May 1, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

हिंगणघाट : शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांना सात बारा हा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाला असून एका दिवसात मिळणारा सातबारा यापुढे शेतकऱ्यांना तीन ते चार महिन्यानंतर मिळणार आहे.निवेदन सादर करताना किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तलाठ्याने संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीची सीडी तयार करून ती आॅनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून त्याद्वारे सात बारा देण्यात येणार आहे. हा आॅनलाईन पद्धतीने दुरूस्त झालेल्या खसरा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शेतकरी पुढील महिन्यापासून नवीन हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामात बँकेकडून कर्ज घ्यावे लागल्यास आॅनलाईन सात बारा शेतकऱ्यांना वेळीच मिळाला नाही तर कर्ज मिळण्यात अडचण येणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सात बारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानने यावेळी निवेदनातून केली. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)