शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्या

By admin | Updated: December 13, 2014 22:44 IST

सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़

वर्धा : सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर केले़ यावेळी लाल्याने ग्रस्त कपाशीची झाडे त्यांना भेट देण्यात आली़ मनसे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना लाल्या रोगाने ग्रासलेली कपाशीची पेंढी भेट दिली़ यावेळी दिलेल्या निवेदनात सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बळीराजावर दुबार-तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे़ हे सर्व करूनही पीक न आल्याने बळीराजा आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. यंदा कापसाला भाव नाही जिल्ह्यात ६० टक्के शेतकरी कपाशी हे मुख्य पीक घेतात; पण यंदा कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन बुडाले, कपाशीला लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी शासनाची मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतोय़ शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा मनसे शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला़ यावेळी उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, नितीन अमृतकर, गोलू भुरे, सागर गायकवाड, आशिष धोबे, सचिन लोखंडे, प्रफूल्ल ढगेसह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)