शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

गरिबाची ‘उज्ज्वला’ दुर्लक्षी धोरणामुळे गॅसवरून चुलीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते.

ठळक मुद्देगृहिणींना ८२१ रुपयांचे सिलिंडर परवडणारे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढती वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणात मोफत गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. परंतु, गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढायला लागले. शासनाकडून मिळणारे अनुदान कमी आणि सिलिंडरचे दर आठशे पार गेल्याने ग्रामीण भागात ‘उज्ज्वला’ योजना गुंडाळली असून गृहिणींनी पुन्हा चूल पेटवायला सुरुवात केली आहे.ग्रामीण भागात चुलीवरच स्वयंपाक केला जातो. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना विविध आजार होतात. तसेच इंधनाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. याच बाबी लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते. यामुळे आता सर्वसामान्यांनाही सिलिंडर घेणे परवडणारे नाहीत. पण करणार काय हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असल्याने उज्ज्वला योजनेतील शेगडी व सिलिंडर गुंडाळून आता पुन्हा चुलीवर रांधायला सुरुवात झाली आहे. 

कमाई कमी, गॅसचा खर्च वाढताचप्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार तर शहरी लाभार्थ्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये ग्राह्य धरले जातात. यावरुन त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अंदाज घेतला तर ते ५,००० रुपयांच्या आतच येते.कमी उत्पन्नात दरमहा ८०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गॅस सिलिंडरवर खर्च करणे त्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे चुलीचाच पर्याय निवडला जात आहे.

गृहिणी काय म्हणतात...

चुलीपेक्षा गॅसवर लवकर स्वयंपाक होतो. त्यामुळे गॅस सिलिंडर घेतले. काही दिवस गॅसचा वापरही केला. परंतु आता सिलिंडरचे दर गगणाला भिडल्याने नियमित गॅसचा वापर करणे परवडणारे नाहीत. म्हणून पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे- वृषाली अजय बोबडे, आर्वी.

उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस-सिलिंडर मिळाल्यापासून चुलीचा वापर कमीच झाला. आता इंधन, रॉकेलही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दीडशे-दोनशे रुपयाने रोजमजुरी करुन सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सिलिंडरचे दर वाढत आहे. अशातही तडजोड करीत आहे.- ज्योती कंगाले, रिधोरा.

शेतातील पºहाटी, तुरीचे फणकट आणि लाकडही सहज उपलब्ध होते. त्यामुळे चुलीचा वापर जास्त असतो.  परंतु कधी ओले इंधन पेटायला वेळ लागतो, कधी कामाची धावपळ असते, अशा वेळी गॅसचा वापर करतो. आता घरोघरी गॅस उपलब्ध झाल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढायला लागल्याने गॅसचा वापर आणखी कमी केला आहे.- प्रणोती झाडे, सोनेगाव (बाई)

सर्वत्रच आता गॅसचा वापर वाढला आहे. शासनाच्या योजनेमुळे गरिबांच्याही घरात आता गॅस सिलिंडर पोहोचले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश घरामध्ये चुलीवरच स्वयंपाक केला जातो. महागड्या गॅसचा वापर मोजक्याच कामासाठी केला जातो.- सुलभा राखुंडे, वर्धा. 

आम्ही दोघेही मोलमजुरी करुन घर चालवितो. आता शासनाची योजना असल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतले. गॅस घेतल्यापासून चुलीचा वापर कमी झाला. परंतु सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने सिलिंडर भरण्यासाठी मोठी अडचण जात आहे.-प्रतिभा बेंडे, झडशी.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर