शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

गरिबाची ‘उज्ज्वला’ दुर्लक्षी धोरणामुळे गॅसवरून चुलीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते.

ठळक मुद्देगृहिणींना ८२१ रुपयांचे सिलिंडर परवडणारे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढती वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणात मोफत गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. परंतु, गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढायला लागले. शासनाकडून मिळणारे अनुदान कमी आणि सिलिंडरचे दर आठशे पार गेल्याने ग्रामीण भागात ‘उज्ज्वला’ योजना गुंडाळली असून गृहिणींनी पुन्हा चूल पेटवायला सुरुवात केली आहे.ग्रामीण भागात चुलीवरच स्वयंपाक केला जातो. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना विविध आजार होतात. तसेच इंधनाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. याच बाबी लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या  ८२१ रुपयांचे  असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते. यामुळे आता सर्वसामान्यांनाही सिलिंडर घेणे परवडणारे नाहीत. पण करणार काय हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असल्याने उज्ज्वला योजनेतील शेगडी व सिलिंडर गुंडाळून आता पुन्हा चुलीवर रांधायला सुरुवात झाली आहे. 

कमाई कमी, गॅसचा खर्च वाढताचप्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार तर शहरी लाभार्थ्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये ग्राह्य धरले जातात. यावरुन त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अंदाज घेतला तर ते ५,००० रुपयांच्या आतच येते.कमी उत्पन्नात दरमहा ८०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गॅस सिलिंडरवर खर्च करणे त्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे चुलीचाच पर्याय निवडला जात आहे.

गृहिणी काय म्हणतात...

चुलीपेक्षा गॅसवर लवकर स्वयंपाक होतो. त्यामुळे गॅस सिलिंडर घेतले. काही दिवस गॅसचा वापरही केला. परंतु आता सिलिंडरचे दर गगणाला भिडल्याने नियमित गॅसचा वापर करणे परवडणारे नाहीत. म्हणून पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे- वृषाली अजय बोबडे, आर्वी.

उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस-सिलिंडर मिळाल्यापासून चुलीचा वापर कमीच झाला. आता इंधन, रॉकेलही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दीडशे-दोनशे रुपयाने रोजमजुरी करुन सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सिलिंडरचे दर वाढत आहे. अशातही तडजोड करीत आहे.- ज्योती कंगाले, रिधोरा.

शेतातील पºहाटी, तुरीचे फणकट आणि लाकडही सहज उपलब्ध होते. त्यामुळे चुलीचा वापर जास्त असतो.  परंतु कधी ओले इंधन पेटायला वेळ लागतो, कधी कामाची धावपळ असते, अशा वेळी गॅसचा वापर करतो. आता घरोघरी गॅस उपलब्ध झाल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढायला लागल्याने गॅसचा वापर आणखी कमी केला आहे.- प्रणोती झाडे, सोनेगाव (बाई)

सर्वत्रच आता गॅसचा वापर वाढला आहे. शासनाच्या योजनेमुळे गरिबांच्याही घरात आता गॅस सिलिंडर पोहोचले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश घरामध्ये चुलीवरच स्वयंपाक केला जातो. महागड्या गॅसचा वापर मोजक्याच कामासाठी केला जातो.- सुलभा राखुंडे, वर्धा. 

आम्ही दोघेही मोलमजुरी करुन घर चालवितो. आता शासनाची योजना असल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतले. गॅस घेतल्यापासून चुलीचा वापर कमी झाला. परंतु सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने सिलिंडर भरण्यासाठी मोठी अडचण जात आहे.-प्रतिभा बेंडे, झडशी.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर