शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

समस्यांचे समाधान गांधीजींनी विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहातून केले

By admin | Updated: January 1, 2017 02:07 IST

आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला

सामदोंग रिंपोंछे : ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर प्रबोधन सेवाग्राम : आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला मानवापासून दूर नेण्याचे काम करीत आहे. मानवाचा विकास हा राजकीय विषयाचा बिंदू ठरल्याचे दिसून येत असल्याने देशातील गरीबी कमी झाली नाही. यामुळे वर्तमान शब्द कठीण वाटत नसला तरी सामान्यांचे जीवन कठीण असल्याचे दिसते. गांधीजींनी समस्यांचे समाधान विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून केले, असे मत आचार्य सामदोंग रिंपोंछे यांनी सांगितले. येथील नई तालीम समितीच्या शांती भवनात गुरूवारी ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सामदोंग रिंपोंछे म्हणाले की, मानव वर्तमान काळात राहतो; पण भविष्य व भूतकाळात वावरतो. कर्तव्यामुळे तो कार्य सरळ करतो. आज जी परिस्थिती दिसते, ती अचानक निर्माण झाली नसून इतिहासाच्या घटनाक्रमातून उत्पन्न झाली. त्यामुळे या समस्यांचे भागीदार आपणही किती आहो, याचा विचार व्हावा, भ. बुद्ध व गांधीजींमध्ये जीवनाला समजण्याची क्षमता समान पातळीवर दिसते. समस्या व दु:खाचे कारण शोधल्यास उपाय मिळतो. त्याला दूर केले की, सुखाची प्राप्ती होते. म्हणून दु:खाचे कारण कलूषित मानसिकता आणि अज्ञानात आहे. गांधीजींना गाडीतून बाहेर ढकलले; पण त्यांनी दोष न देता कारणाचे शोधण व निवारण केले. यातूनच असत्याची विचारधारा, शोषणाची दिशा यावर काम करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग मिळाला. विकास स्वरूप प्राप्त करण्यासाठी लाभ-हानीचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. प्रकृतीचे शोषण केले जाते. पुंजीवाद व औद्योगिक सत्ता एकवटली जात असून याचे गंभीर संकेत मिळत आहे. मोठ्या हानीचा सामना करावा लागत आहे. मनुष्याला संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. चर्चमध्ये बुटात जातो; पण विमानात तपासणी होते. शेजारी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध असावे. पर्यावरणाचा ऱ्हास घातक ठरत आहे; पण समाधान मिळत नाही. म्हणून परत गांधीजींच्या सत्य, अहिंसेकडे वळावेच लागेल. सत्याग्रहात तर्कविर्तक शोधण्याची गरज नाही. गांधीजींच्या जीवन पद्धतीला समजून घेत कार्य करणाऱ्यांनी प्रचार, प्रसाराचे काम चालूच ठेवावे. कार्य, साधन शुद्धता, चित्त शुद्धता ठेवावे. स्वार्थरहित असावे. शोषणाचे साधन बनू नये. जीवन पवित्र असल्याने समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. प्रारंभी आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘इतनी शक्ती हमे दे’ गीत गायले. प्रास्ताविक डॉ. सुगन बरंठ, संचालन प्रदीप खेलूलकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले.(वार्ताहर)