शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांचे समाधान गांधीजींनी विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहातून केले

By admin | Updated: January 1, 2017 02:07 IST

आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला

सामदोंग रिंपोंछे : ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर प्रबोधन सेवाग्राम : आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला मानवापासून दूर नेण्याचे काम करीत आहे. मानवाचा विकास हा राजकीय विषयाचा बिंदू ठरल्याचे दिसून येत असल्याने देशातील गरीबी कमी झाली नाही. यामुळे वर्तमान शब्द कठीण वाटत नसला तरी सामान्यांचे जीवन कठीण असल्याचे दिसते. गांधीजींनी समस्यांचे समाधान विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून केले, असे मत आचार्य सामदोंग रिंपोंछे यांनी सांगितले. येथील नई तालीम समितीच्या शांती भवनात गुरूवारी ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सामदोंग रिंपोंछे म्हणाले की, मानव वर्तमान काळात राहतो; पण भविष्य व भूतकाळात वावरतो. कर्तव्यामुळे तो कार्य सरळ करतो. आज जी परिस्थिती दिसते, ती अचानक निर्माण झाली नसून इतिहासाच्या घटनाक्रमातून उत्पन्न झाली. त्यामुळे या समस्यांचे भागीदार आपणही किती आहो, याचा विचार व्हावा, भ. बुद्ध व गांधीजींमध्ये जीवनाला समजण्याची क्षमता समान पातळीवर दिसते. समस्या व दु:खाचे कारण शोधल्यास उपाय मिळतो. त्याला दूर केले की, सुखाची प्राप्ती होते. म्हणून दु:खाचे कारण कलूषित मानसिकता आणि अज्ञानात आहे. गांधीजींना गाडीतून बाहेर ढकलले; पण त्यांनी दोष न देता कारणाचे शोधण व निवारण केले. यातूनच असत्याची विचारधारा, शोषणाची दिशा यावर काम करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग मिळाला. विकास स्वरूप प्राप्त करण्यासाठी लाभ-हानीचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. प्रकृतीचे शोषण केले जाते. पुंजीवाद व औद्योगिक सत्ता एकवटली जात असून याचे गंभीर संकेत मिळत आहे. मोठ्या हानीचा सामना करावा लागत आहे. मनुष्याला संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. चर्चमध्ये बुटात जातो; पण विमानात तपासणी होते. शेजारी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध असावे. पर्यावरणाचा ऱ्हास घातक ठरत आहे; पण समाधान मिळत नाही. म्हणून परत गांधीजींच्या सत्य, अहिंसेकडे वळावेच लागेल. सत्याग्रहात तर्कविर्तक शोधण्याची गरज नाही. गांधीजींच्या जीवन पद्धतीला समजून घेत कार्य करणाऱ्यांनी प्रचार, प्रसाराचे काम चालूच ठेवावे. कार्य, साधन शुद्धता, चित्त शुद्धता ठेवावे. स्वार्थरहित असावे. शोषणाचे साधन बनू नये. जीवन पवित्र असल्याने समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. प्रारंभी आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘इतनी शक्ती हमे दे’ गीत गायले. प्रास्ताविक डॉ. सुगन बरंठ, संचालन प्रदीप खेलूलकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले.(वार्ताहर)