शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारच समाजात नवसंजीवनी आणेल!

By admin | Updated: November 29, 2014 23:25 IST

महात्मा गांधी यांच्या विचाराने पे्ररित झालेला कार्यकर्ता वैयक्तिक जीवनासह संवेदनशीलतेने समाजात नवसंजीवनी निर्माण करेल, असे मत गांधी विचारक व्याख्यात कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले.

वर्धा : महात्मा गांधी यांच्या विचाराने पे्ररित झालेला कार्यकर्ता वैयक्तिक जीवनासह संवेदनशीलतेने समाजात नवसंजीवनी निर्माण करेल, असे मत गांधी विचारक व्याख्यात कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले. मगन संग्रहालयात गांधी ‘विचाराबद्दल समाजात पसरविलेले गैरसमज व इतिहासातील सत्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले़ यावेळी गांधी विचारांशी जुळलेल्या कार्यकर्त्यांना प्रबोधन करताना ते बोलत होते़ कुमार प्रशांत पूढे म्हणाले की, महात्मा गांधींना दोन पद्धतीने स्वीकार केला, सुविधांचे गांधी व द्विदातले गांधी आहे. शासन आणि प्रशासनाने सुविधांचे गांधी विचारांचा स्वीकार केला व गांधी विचारकांनी द्विदाच्या गांधींचा अवलंब केला. कारण, यांना रचनात्मक कामांच्या उपयोगावर विश्वास राहिला नाही. यामुळे सुविधांच्या गांधीने गांधी विचारातील तत्वज्ञानाचे तुकडे केले तर द्विदा गांधींनी विचारांचे महत्त्व कमी केले; पण महात्मा गांधी ही संपत्ती कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. जगात ख्रिश्चन धर्मपुस्तकांच्या प्रकाशनानंतर प्रत्येक वर्षाला गांधी व्यक्तिमत्वावर ३०० पुस्तके प्रकाशित होतात़ महात्मा गांधी यांनी लिहिलेली हिंद स्वराज पुस्तक सर्वाधिक लहान आहे; पण ते आजच्या वर्तमान परिस्थितीचे दर्शन घडवित आहे़ या पुस्तकावर विविध देशाचे संशोधन कार्य चाललेले आहे. महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील समाज संयमनियंत्रित व संयमचलित असायला पाहिजे. ज्याचा आधार सामान्य नागरिक आहे. चुकीच्या मार्गाने भ्रमित झालेल्या प्रत्येक माणसावर समाज नियंत्रण ठेवेल़ यातून ग्रामस्वराज्य साकार होईल, असे गांधीजींचे विचार होते.अनियंत्रित पुंजीवाद समाजात असंतुलन निर्माण करीत आहे. पुंजीवाद आणि सत्ता एकत्रित आल्यास समाज परावलंबी होईल. जसे समाजात रचनात्मक कार्य करणाऱ्या शक्तीपेक्षा सांप्रदायिकता, विषमता, हिंसा पसरविणाऱ्या शक्ती वेगाने आणि मजबुतीने काम करीत आहे. या शक्तीला समाजाने वेळीच नियंत्रित न केल्यास गांधी विचार अप्रभावी ठरतील़ गांधी विचाराने पे्ररित झालेल्या कार्यकर्ता सत्य व अहिंसेच्या आधारे अवाजवी आवाजांना व बंदुकांच्या भीतीला न घाबरता निष्ठेने सुजान समाज निर्मितीसाठी कार्य करावे. गांधीजींचे शेवटचे लिखित वाक्य असे होते की, भारतातील सात लाख गावांत प्रत्येक गावाच्या एक रचनात्मक कार्यकर्ता मिळाला तर मी नव्या भारताची निर्मिती करू शकतो, असे मत गांधी विचारक व्याख्याते कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले. व्याख्यानाला ३० संस्थांचे गांधी विचारांशी जुळलेले १२० कार्यकर्ते उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)