शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गांधी आश्रम पर्यटनस्थळ नव्हे तर जगाचे प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम, कोविड विषयी जनजागृती चित्ररथाला दाखविली हिरवीझेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अमृत महोत्सव साजरा करीत असताना अधिकारा सोबत कर्तव्याचाही भाग असला पाहिजे. वर्धा जिल्हा ही गांधीजींची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नव्हे तर जगासाठी प्रेरणास्थान असून ते कायम राहिले पाहिजेच, असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.येथील गांधी आश्रमात शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, सर्व सेवा संघांचे अशोक शरण, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. केदार पुढे म्हणाले, ऐतिहासिक पद्धतीने हा दिवस साजरा करीत आहे. गांधीजींची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे. पुढीच्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी गांधी हा विषय लोकांपर्यंत नेला पाहिजे. कारण या देशात जी क्रांती घडली ती विचारधारेने घडली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अशोक शरण यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. मुकुंद मस्के यांनी बापू का काम अभी बाकी है ही कव्वाली सादर केली. संचालन नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी केले. याप्रसंगी सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, तहसीलदार स्वप्नील दिगलवार, शरद सुर्यवंशी, सिद्धेश्वर उंबरकर, रामेश्वर गाखरे, मिथून हरडे, विजय धुमाळे, संगीता चव्हाण, दीपाली उंबरकर, अश्विनी बघेल, रूपाली उगले, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, उर्मीला देशमुख, पांडुरंग गोसावी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान कोरोना विषयक जनजागृतीपर चित्ररथाला मान्यवरांनी हिरवीझेंडी दाखविली. या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी कसे कोविडमुक्त रहावे याची माहिती दिली जाणार आहे. मान्यवरांचे स्वागत सुतमाला देऊन करण्यात आले.  

सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठ : रामदास तडससाबरमती आश्रम येथे पदयात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवीझेडी दाखविली. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मुठभर मिठ उचलून गांधीजींनी कायद्याचा विरोध केला. येथूनच स्वातंत्र्य चळवळीला सर्वाधिक बळ मिळाले. त्यामुळे सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठच आहे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी मांडले. 

अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे : आंबटकर आश्रम आणि स्वातंत्र्याचे अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. आपल्याला इतिहासाची एक बाजू माहित असते तर दुसरी नाही. गितांतून बापूंच्या विचारांचा संदेश आहे. या जिल्ह्यात आष्टीचा इतिहासही नवीन पिढीला ज्ञात असला पाहिजे. तरूणांनी ध्येयवाद जपावा, असे आमदार रामदास आंबटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम