शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

गांधी आश्रम पर्यटनस्थळ नव्हे तर जगाचे प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम, कोविड विषयी जनजागृती चित्ररथाला दाखविली हिरवीझेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अमृत महोत्सव साजरा करीत असताना अधिकारा सोबत कर्तव्याचाही भाग असला पाहिजे. वर्धा जिल्हा ही गांधीजींची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नव्हे तर जगासाठी प्रेरणास्थान असून ते कायम राहिले पाहिजेच, असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.येथील गांधी आश्रमात शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, सर्व सेवा संघांचे अशोक शरण, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. केदार पुढे म्हणाले, ऐतिहासिक पद्धतीने हा दिवस साजरा करीत आहे. गांधीजींची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे. पुढीच्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी गांधी हा विषय लोकांपर्यंत नेला पाहिजे. कारण या देशात जी क्रांती घडली ती विचारधारेने घडली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अशोक शरण यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. मुकुंद मस्के यांनी बापू का काम अभी बाकी है ही कव्वाली सादर केली. संचालन नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी केले. याप्रसंगी सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, तहसीलदार स्वप्नील दिगलवार, शरद सुर्यवंशी, सिद्धेश्वर उंबरकर, रामेश्वर गाखरे, मिथून हरडे, विजय धुमाळे, संगीता चव्हाण, दीपाली उंबरकर, अश्विनी बघेल, रूपाली उगले, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, उर्मीला देशमुख, पांडुरंग गोसावी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान कोरोना विषयक जनजागृतीपर चित्ररथाला मान्यवरांनी हिरवीझेंडी दाखविली. या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी कसे कोविडमुक्त रहावे याची माहिती दिली जाणार आहे. मान्यवरांचे स्वागत सुतमाला देऊन करण्यात आले.  

सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठ : रामदास तडससाबरमती आश्रम येथे पदयात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवीझेडी दाखविली. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मुठभर मिठ उचलून गांधीजींनी कायद्याचा विरोध केला. येथूनच स्वातंत्र्य चळवळीला सर्वाधिक बळ मिळाले. त्यामुळे सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठच आहे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी मांडले. 

अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे : आंबटकर आश्रम आणि स्वातंत्र्याचे अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. आपल्याला इतिहासाची एक बाजू माहित असते तर दुसरी नाही. गितांतून बापूंच्या विचारांचा संदेश आहे. या जिल्ह्यात आष्टीचा इतिहासही नवीन पिढीला ज्ञात असला पाहिजे. तरूणांनी ध्येयवाद जपावा, असे आमदार रामदास आंबटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम