शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

चार महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना धान्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 29, 2014 02:41 IST

गोरगरिबांना धान्य पुरवठा करणार्‍या स्वस्त धान्य दुकानांतून दहा महिन्यांपासून साखर बेपत्ता झाली आहे.

वायगाव (नि.) : गोरगरिबांना धान्य पुरवठा करणार्‍या स्वस्त धान्य दुकानांतून दहा महिन्यांपासून साखर बेपत्ता झाली आहे. केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जात आहे. यातही केशरी कार्ड धारकाना गत तीन ते चार महिन्यांपासून कोणतेही धान्य मिळाले नाही. यामुळे लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे.

वर्धा तालुक्यात साखरेची मागणी असताना गत दहा महिन्यांपासून पुरवठा विभागाने साखरेचे वितरण केले नाही. रॉकेल मिळणेही कठीण झाले असून मागणीच्या प्रमाणात केवळ ४0 टक्के रॉकेलचा पुरवठा व वितरण होत आहे. शहर व ग्रामीण भागासाठी १३ टँकर म्हणजे १ लाख ५६ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला जातो. वास्तविक, शहर व ग्रामीण भागात २५ टँकर म्हणजे ३ लाख लिटरच्या वर रॉकेल आवश्यक आहे. पुरवठा केवळ १३ टँकर होत असल्याने रॉकेलची वितरण व्यवस्था कोलमडली आहे.

अन्न सुरक्षा योजना राबविताना शासनाला जुन्या वितरण योजनेचा विसरच पडल्याचे दिसते. बिपीएल व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना गहू व तांदळाचा पुरवठा होतो; पण या धान्यात पूर्वीची गुणवत्ता नसल्याची ओरड होत आहे. वर्धा तालुक्यात १४६ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शहरात ४६ धान्य दुकाने आहे. वर्धा तालुक्यात ५२ हजार ३६५ रेशन कार्डधारक आहे. यानुसार प्रत्येक दुकानदाराला शिधापत्रिकेनुसार धान्यसाठा दिला जात असल्याचे सांगितले जाते. खासगी दुकानात साखरेची किंमत ३४ ते ३५ रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातील १४ रुपये किलो साखर लाभार्थ्यांना परवडणारी आहे; पण दहा महिन्यांपासून साखरेचा पुरवठाच झाला नाही. यामुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातील महागडी साखर खरेदी करावी लागत आहे. गहू व तांदूळाची पतही खालावली. ३-४ महिन्यांपासून लाभार्थी स्वस्त धान्याच्या दुकानात चकरा मारत आहे; पण धान्य मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)