शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

फरार जावयाला चार महिन्यांनी मुंबईत अटक

By admin | Updated: August 27, 2016 00:28 IST

मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर

शहर पोलिसांची कारवाई : रेल्वे पुलाखाली लपविला होता चाकूवर्धा : मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर बुधवारी मुंबई येथून ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले. राजेश उर्फ राजू चंद्रकांत भगत असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला रात्रीच वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. हत्या करण्याकरिता वापरलेला चाकू त्याने रेल्वे पूलाखाली दडवून ठेवल्याची कबुली दिली असून पोलिसांनीही तो जप्त केला आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली माला राजू भगत व तिचा भाऊ नरेंद्र यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मुंबईचा रहिवासी राजू भगत याचा वर्धा येथील समतानगर भागात राहणाऱ्या माला मारोतराव कांबळे हिच्याशी विवाह झाला होता. राजू हा शंकाखोर स्वभावाचा असल्यामुळे माला हिला नेहमीच त्रास द्यायचा. त्यामुळे ती मुलीला घेऊन वर्ध्याला निघून आली. त्यानंतर दोन ते तीन वेळा राजू पत्नीला घेण्याकरिता वर्ध्याला आला. पण पत्नीने सोबत येण्यास नकार दिला. १६ एप्रिलला तो पुन्हा वर्ध्यात आला असता पत्नी मालाने सोबत येण्याची तयारी दर्शविली, मात्र आधी बैठक घेण्याची अट घातली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात राजूने मालाचा मोठा भाऊ देवानंद मारोतराव कांबळे (४०) यांच्या पोटावर चाकूचे वार केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्याने लहान साळा नरेंद्र याच्यावरही चाकूने वार केले. यात तोही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेपासून फरार असालेल्या राजूचा शोध सुरू होता. राजू सतत स्थळ बदलवित कधी गुजरात, कधी हैदराबाद, कधी उत्तरप्रदेश तर कधी मुंबई असा तो फिरत होता. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पत्नी माला व साळा नरेंद्रशी संपर्क साधून धमकी देत होता. हाच धागा पकडून ठाणेदार शिरतोडे यांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुंबईच्या मानखुदृ भागात अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंदू खोंड, जमादार प्रमोद जांभुळकर, श्रीकांत खडसे, सचिन वाटखेडे, धुर्वे यांच्या चमूने केली.(प्रतिनिधी)