शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

कड्याळूच्या मुळ्या खाल्ल्याने चार गाई दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:16 IST

कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देविरुळ गावात खळबळ : दहा गार्इंची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.सध्या या भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा प्रसंग पशुपालकांवर ओढवला आहे. अशातच चारा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या गावातील पशुपालकांच्या गाई जंगलात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. दरम्यान, या गार्इंनी कढाऊ पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. यातच त्यांना विषबाधा होत त्यांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. यात चार गार्इंचा तडफडून मृत्यू झाला तर इतर जनावरांची प्रकृती खालावल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांवर उपचार सुरू केला. त्यांच्या प्रयत्नामुळे सहा गार्इंचे प्राण बचावले. तर सहा गार्इंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुनील सालंकार यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत जनावरांसाठी घटनास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केली होती.ज्वारीचे मूळ खाणे बेतले जीवावरखरांगणा (मो.) - परिसरातील पशुपालकांना वैरण टंचाईच्या झळा सध्या सहन कराव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी ज्वारीचे मूळ खाल्ल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. तर १५ गार्इंची प्रकृती खालविली. ही घटना नजीकच्या दहेगाव (गोंडी) शेत शिवारात घडली. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दहेगाव (गोंडी) येथील राजाभाऊ देशमुख यांच्याकडे एकूण २० गाई आहेत. सोमवारी त्यांच्याकडे कामावर असलेल्या गड्याने सदर जनावरे जंगलाच्या दिशेने चारण्यासाठी नेली. दरम्यान, जनावरांनी शेत शिवारात असलेल्या ज्वारी पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर जनावरांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाल्याने त्याने घटनेची माहिती तातडीने राजाभाऊ देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने दहेगाव (गोंडी) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांची पाहणी केली असता पाच जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले. तर उर्वरित १५ जनावरांना औषधोपचार सुरू केला. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.