शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

कड्याळूच्या मुळ्या खाल्ल्याने चार गाई दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:16 IST

कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देविरुळ गावात खळबळ : दहा गार्इंची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.सध्या या भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा प्रसंग पशुपालकांवर ओढवला आहे. अशातच चारा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या गावातील पशुपालकांच्या गाई जंगलात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. दरम्यान, या गार्इंनी कढाऊ पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. यातच त्यांना विषबाधा होत त्यांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. यात चार गार्इंचा तडफडून मृत्यू झाला तर इतर जनावरांची प्रकृती खालावल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांवर उपचार सुरू केला. त्यांच्या प्रयत्नामुळे सहा गार्इंचे प्राण बचावले. तर सहा गार्इंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुनील सालंकार यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत जनावरांसाठी घटनास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केली होती.ज्वारीचे मूळ खाणे बेतले जीवावरखरांगणा (मो.) - परिसरातील पशुपालकांना वैरण टंचाईच्या झळा सध्या सहन कराव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी ज्वारीचे मूळ खाल्ल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. तर १५ गार्इंची प्रकृती खालविली. ही घटना नजीकच्या दहेगाव (गोंडी) शेत शिवारात घडली. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दहेगाव (गोंडी) येथील राजाभाऊ देशमुख यांच्याकडे एकूण २० गाई आहेत. सोमवारी त्यांच्याकडे कामावर असलेल्या गड्याने सदर जनावरे जंगलाच्या दिशेने चारण्यासाठी नेली. दरम्यान, जनावरांनी शेत शिवारात असलेल्या ज्वारी पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर जनावरांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाल्याने त्याने घटनेची माहिती तातडीने राजाभाऊ देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने दहेगाव (गोंडी) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांची पाहणी केली असता पाच जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले. तर उर्वरित १५ जनावरांना औषधोपचार सुरू केला. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.