शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
3
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
4
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
5
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
6
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
7
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
8
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
9
१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
10
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
11
उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम; 2026 मध्ये देशाला मिळणार चारही दिशा जोडणारे 8 नवे एक्सप्रेसवे
12
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
14
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
15
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
16
नव्या वर्षात मुंबई, कोकण, पुण्यात म्हाडाची लॉटरी; आचारसंहिता संपताच प्रक्रियेला वेग 
17
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
18
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
19
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
20
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कड्याळूच्या मुळ्या खाल्ल्याने चार गाई दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:16 IST

कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देविरुळ गावात खळबळ : दहा गार्इंची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.सध्या या भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा प्रसंग पशुपालकांवर ओढवला आहे. अशातच चारा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या गावातील पशुपालकांच्या गाई जंगलात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. दरम्यान, या गार्इंनी कढाऊ पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. यातच त्यांना विषबाधा होत त्यांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. यात चार गार्इंचा तडफडून मृत्यू झाला तर इतर जनावरांची प्रकृती खालावल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांवर उपचार सुरू केला. त्यांच्या प्रयत्नामुळे सहा गार्इंचे प्राण बचावले. तर सहा गार्इंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुनील सालंकार यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत जनावरांसाठी घटनास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केली होती.ज्वारीचे मूळ खाणे बेतले जीवावरखरांगणा (मो.) - परिसरातील पशुपालकांना वैरण टंचाईच्या झळा सध्या सहन कराव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी ज्वारीचे मूळ खाल्ल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. तर १५ गार्इंची प्रकृती खालविली. ही घटना नजीकच्या दहेगाव (गोंडी) शेत शिवारात घडली. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दहेगाव (गोंडी) येथील राजाभाऊ देशमुख यांच्याकडे एकूण २० गाई आहेत. सोमवारी त्यांच्याकडे कामावर असलेल्या गड्याने सदर जनावरे जंगलाच्या दिशेने चारण्यासाठी नेली. दरम्यान, जनावरांनी शेत शिवारात असलेल्या ज्वारी पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर जनावरांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाल्याने त्याने घटनेची माहिती तातडीने राजाभाऊ देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने दहेगाव (गोंडी) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांची पाहणी केली असता पाच जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले. तर उर्वरित १५ जनावरांना औषधोपचार सुरू केला. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.