शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

गडही गेला आणि सिंहही गेला...

By admin | Updated: February 24, 2017 02:09 IST

देवळी तालुक्यातील खरी लढत उमेदवारांत नव्हतीच तर ती दोन पहेलवानांमध्ये होती.

वर्धा : देवळी तालुक्यातील खरी लढत उमेदवारांत नव्हतीच तर ती दोन पहेलवानांमध्ये होती. काँगे्रसला बालेकिल्ला राखायचा होता तर भाजपाला तो गड पूर्णत: काबीज करायचा होता. यामुळे प्रत्येक लढत आमदार विरूद्ध खासदार, अशीच झाली; पण यात काँग्रेसचा गडही गेला आणि सिंहही गेला, अशी स्थिती झाले. परिणामी, काँगे्रसवर अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची वेळच आल्याचे दिसते. देवळी तालुक्यात नाचणगाव, गुंजखेडा, इंझाळा, भिडी, गौळ व अंदोरी, हे सहा गट आहे. यातील भिडी येथील लढत आमदार व खासदाराची प्रत्यक्ष भिडंत तर अन्य गटांत प्रतिष्ठा पणाला होती. काही वर्षांपूर्वी केवळ काँगे्रसचे प्राबल्य असलेले देवळीतील गट हळूहळू भाजपच्या ताब्यात गेले. हा बालेकिल्ला राखण्यासाठी आ. कांबळे यांच्यासह काँग्रेसींनी आटापिटा केला; पण एकही गट राखता आला नाही. सहापैकी भिडी, गौळ, इंझाळा, गुंजखेडा व नाचणगाव या पाच गटांवर भाजपाने झेंडा फडकाविला तर अंदोरी गट राष्ट्रवादी काँगे्रसने राखला. एकेकाळी बालेकिल्ला असलेला देवळी तालुका काँगे्रसला यंदाच्या निवडणुकीत गमवावा लागला. प्रतिष्ठेच्या लढाईत आमदाराचे खासदाराने पानीपत केले. हा पराभव काँग्रेसला जिव्हारी लागणारा असून चिंतन करायला भाग पाडणारा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)