शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

महात्मा गांधी विद्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:56 IST

स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकीची असून सदर घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभौतिकशास्त्र प्रयोगशाळेसह वर्गखोल्यांतील साहित्य जळून कोळसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकीची असून सदर घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दुपारी भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पोलीस विभागासह नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; पण तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. या आगीत भौतिकशास्त्र प्रयोग शाळा, महात्मा गांधी विद्यालयाच्या तीन वर्ग खोल्या व एका स्वयंपाक खोलीतील साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी घटनास्थळ गाठले होते.महात्मा गांधी विद्यालयाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जि.प.अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीची माहिती मिळताच जि.प. अध्यक्ष मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रयोगशाळा व इतर साहित्य जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं., शाळा तसेच जिल्हास्तरीय व पंचायत समितीस्तरीय कार्यालयातील दस्तऐवज सुरक्षित राहावा या दृष्टीने उपाययोजना करण्याचाही सूचना केल्या आहेत.