शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

By admin | Updated: May 9, 2015 02:02 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहार गत एक वर्षापासून पूर्णत: ठप्प आहे़ ...

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहार गत एक वर्षापासून पूर्णत: ठप्प आहे़ यामुळे ठेवीदारांसह कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गत १० महिन्यांपासून बँकेतील एकाही कर्मचाऱ्याला वेतन मिळालेले नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती या आर्थिक संकटाने बिघडली असून काहींना पर्यायी रोजगार शोधावा लागत असल्याचे चित्र आहे़जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे व्यवहार गत एक वर्षापासून ठप्प आहे़ कोणतेही व्यवहार नसल्याने कृषीकर्जापोटी वितरित केलेले कर्जही परत येत नाही़ यामुळे दैनंदिन व्यवहारांना खीळ बसली आहे़ कर्जाच्या रूपात इतरांना वितरित केलेले पैसे परत मिळाले नाही. अशातच बँकेतून होणारे शिक्षकांचे वेतन, ओडीचे व्यवहारही अन्य बँकांत स्थलांतरित झाले. याच बँकेत पूर्वी वीज वितरण कंपनीची देयके स्वीकारली जात होती. तेही व्यवहार बंद करण्यात आले. परिणामी, बँकेत सध्या पैसे भरण्याकरिता कुणीही येत नाही. केवळ पैसे परत मागणारेच येताना आढळतात. संपूर्ण आर्थिक व्यवहार बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. १० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने त्यांच्या घरची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काहींची मुले दहावी व बारावीत शिक्षण घेत आहे़ त्यांना शिकवणी लावणे आवश्यक असताना आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने ती लावता येत नाही. शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून देता येत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त केली. काही कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा तर काहींना शुगर, किडणीसह अन्य आजार जडले आहेत. ते कर्मचारी पूर्वी शहरातील नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचार घेत होते; पण पैशाअभावी अनेकांनी सावंगी वा सेवाग्राम रुग्णालयाची वाट धरली. यातही औषध लिहून दिल्यावर ते घेण्याची सोय खिशात नसल्याचे सांगण्यात येते. काही कर्मचाऱ्यांच्या गृहिणींना गंभीर आजार आहेत. त्यांच्यावर उपचार करता येत नसल्याची खंत व्यक्त करतात़ काही कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज तर काहींनी मुलांच्या शिक्षणाकरिता कर्जाची उचल केली. त्या कर्जाचे हप्तेही भरता येत नाही. बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. ते लवकर सुरु करण्याची गरज आहे.(कार्यालय प्रतिनिधी)