शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे.

वर्धा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या वीज शुल्कात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे.पूर्वी विद्युत शुल्क १५ टक्के होते ते आता १६ टक्के करण्यात आले आहे. याचवेळी व्यापारी ग्राहकांचे वीजबिल चार टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती ग्राहकांना जर ५०० रुपये बिल द्यावे लागत असेल तर यानंतर ५०५ रुपये द्यावे लागेल. २००० रुपेय बिल येणाऱ्यांना २०२० रुपये तर एक हजार रुपये बिल देणाऱ्यांना यापूढे एक हजार १० रुपये बिल द्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील करवाढीची अंमलबजावणी याच महिन्यापासून केली जाणार आहे. शिवाय राज्यात सात हजार ५०० सौर कृषिपंप बसविले जाणार आहे. या योजनेला निधी पुरविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील वीजदरात एक टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ प्रतियुनिट एक पैसा एवढी राहणार आहे. व्यापारी वीज ग्राहकांना चार टक्क्यांनी वीज वाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही शुल्कवाढ आकस्मिक केल्याची चर्चा होती. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होतोय.(कार्यालय प्रतिनिधी)इमरजंसीच्या नावाखाली होतेय भारनियमन; शेतकरी त्रस्तसेलू : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरणच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत आहे. वीज पुरवठ्यात आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. घोराड हे गाव पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येचे असून बागायती शेतीचे क्षेत्र आहे. या गावाला तीन लाईनमन वीज वितरणाचा कारभार पाहत होते. यापैकी एक सेवानिवृत्त झाले असून उर्वरित दोनपैकी एक आजारी असल्याच्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने एका लाईनमनच्या भरवशावर गाव व कृषी पंपाची जबाबदारी आली आहे. गत काही दिवसांपासून वारा, वादळामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड करणारे शेतकरी व केळी बागायतदारांपूढे नवीन संकट उभे ठाकले आहे. ओलिताचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. गावातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास रात्र अंधारात काढावी लागते. शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसागणिक प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. त्यातच घोराड कार्यालयाच्या अभियंत्यांची बदली नागपूरला झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घोराड गावच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी एक लाईनमन कशी सांभाळणार, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. इमरजंसीच्या नावावर भारनयिमन करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यासाठी घोराड येथे लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह केळी उत्पादक व शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)