शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे.

वर्धा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या वीज शुल्कात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे.पूर्वी विद्युत शुल्क १५ टक्के होते ते आता १६ टक्के करण्यात आले आहे. याचवेळी व्यापारी ग्राहकांचे वीजबिल चार टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती ग्राहकांना जर ५०० रुपये बिल द्यावे लागत असेल तर यानंतर ५०५ रुपये द्यावे लागेल. २००० रुपेय बिल येणाऱ्यांना २०२० रुपये तर एक हजार रुपये बिल देणाऱ्यांना यापूढे एक हजार १० रुपये बिल द्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील करवाढीची अंमलबजावणी याच महिन्यापासून केली जाणार आहे. शिवाय राज्यात सात हजार ५०० सौर कृषिपंप बसविले जाणार आहे. या योजनेला निधी पुरविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील वीजदरात एक टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ प्रतियुनिट एक पैसा एवढी राहणार आहे. व्यापारी वीज ग्राहकांना चार टक्क्यांनी वीज वाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही शुल्कवाढ आकस्मिक केल्याची चर्चा होती. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होतोय.(कार्यालय प्रतिनिधी)इमरजंसीच्या नावाखाली होतेय भारनियमन; शेतकरी त्रस्तसेलू : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरणच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत आहे. वीज पुरवठ्यात आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. घोराड हे गाव पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येचे असून बागायती शेतीचे क्षेत्र आहे. या गावाला तीन लाईनमन वीज वितरणाचा कारभार पाहत होते. यापैकी एक सेवानिवृत्त झाले असून उर्वरित दोनपैकी एक आजारी असल्याच्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने एका लाईनमनच्या भरवशावर गाव व कृषी पंपाची जबाबदारी आली आहे. गत काही दिवसांपासून वारा, वादळामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड करणारे शेतकरी व केळी बागायतदारांपूढे नवीन संकट उभे ठाकले आहे. ओलिताचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. गावातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास रात्र अंधारात काढावी लागते. शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसागणिक प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. त्यातच घोराड कार्यालयाच्या अभियंत्यांची बदली नागपूरला झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घोराड गावच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी एक लाईनमन कशी सांभाळणार, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. इमरजंसीच्या नावावर भारनयिमन करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यासाठी घोराड येथे लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह केळी उत्पादक व शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)