शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उघाडीने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: August 14, 2014 00:02 IST

उशिरा आलेल्या पावसामुळे लावणही उशिराच झाली. त्यातच जुलै महिन्यात तीनच दिवस कहर केल्याने दुबार-तिबार संकटानंतर तालुक्यातील बाकळी, वर्धा, आडनदी काठावरील शेतपिके

आर्वी : उशिरा आलेल्या पावसामुळे लावणही उशिराच झाली. त्यातच जुलै महिन्यात तीनच दिवस कहर केल्याने दुबार-तिबार संकटानंतर तालुक्यातील बाकळी, वर्धा, आडनदी काठावरील शेतपिके अतिवृष्टीने खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण २३ जुलैपासून आर्वी तालुक्यात पावसाने उघाड दिल्याने उरले-सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. पुन्हा शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.आर्वी तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने ग्रासला असून आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षीच्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने ग्रासल्याने यावर्षी तरी शेती हंगाम चांगला राहील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु पंधरवड्यापासून पाऊस गायब झाल्याने व सध्या शेतपिकांना वाढीसाठी पावसाची नितांत गरज असल्याने आकाशाकडे नजरा लागल्या आहे.आर्वी तालुक्यात सोयाबीन व कपाशी पिकावर अतिवृष्टीने थैमान घातल्याने उरले सुरले पीक हाती यावे यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा नाही. त्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. १५ दिवसांपासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. आधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना ग्रासले. आता पावसाच्या उघाडीने शेतकरी त्रस्त असून दुहेरी संकटात शेतकरी सध्या सापडला आहे.(तालुका प्रतिनिधी)