शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

पावसाच्या उघाडीने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: August 14, 2014 00:02 IST

उशिरा आलेल्या पावसामुळे लावणही उशिराच झाली. त्यातच जुलै महिन्यात तीनच दिवस कहर केल्याने दुबार-तिबार संकटानंतर तालुक्यातील बाकळी, वर्धा, आडनदी काठावरील शेतपिके

आर्वी : उशिरा आलेल्या पावसामुळे लावणही उशिराच झाली. त्यातच जुलै महिन्यात तीनच दिवस कहर केल्याने दुबार-तिबार संकटानंतर तालुक्यातील बाकळी, वर्धा, आडनदी काठावरील शेतपिके अतिवृष्टीने खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण २३ जुलैपासून आर्वी तालुक्यात पावसाने उघाड दिल्याने उरले-सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. पुन्हा शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.आर्वी तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने ग्रासला असून आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षीच्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने ग्रासल्याने यावर्षी तरी शेती हंगाम चांगला राहील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु पंधरवड्यापासून पाऊस गायब झाल्याने व सध्या शेतपिकांना वाढीसाठी पावसाची नितांत गरज असल्याने आकाशाकडे नजरा लागल्या आहे.आर्वी तालुक्यात सोयाबीन व कपाशी पिकावर अतिवृष्टीने थैमान घातल्याने उरले सुरले पीक हाती यावे यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा नाही. त्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. १५ दिवसांपासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. आधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना ग्रासले. आता पावसाच्या उघाडीने शेतकरी त्रस्त असून दुहेरी संकटात शेतकरी सध्या सापडला आहे.(तालुका प्रतिनिधी)