शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:07 IST

गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली.

गहाण खतासाठी खर्चिक प्रक्रिया अडचणीचीरोहणा : गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली. यामुळे परिसरातील कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरण्या साधल्या आहेत. याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असले तरी कर्जाचे पुनर्गठन व त्यातील शेती गहाण करून देण्याची खर्चिक प्रक्रिया यामुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले नाही. परिणामी, बँकाच्या दिशेने होणारी पायपीट सुरूच आहे.पेरण्या साधल्या तर उत्पन्नही चांगले येते, या अनुभवामुळे शेतकऱ्यांत उत्साह दिसतो. पेरण्या साधल्या तरी खते व किटकनाशके यांची व्यवस्था व मजुरांची मजुरी देण्यासाइी शेतकऱ्यांना बँक कर्जाची मोठी गरज असते. एक वर्षाच्या थकित कर्जाचेच पुनर्गठण होईल, त्यापेक्षा अधिक वर्षाच्या थकित कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, ही अट अडसर ठरत आहे. एक लाखापेक्षा अधिक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन गहाण करून देणे अनिवार्य आहे. यासाठी खर्च अधिक व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. हा खर्च २० हजार रुपयांपर्यंत जात असल्याने अनेक शेतकऱ्यांची नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था बँकेने केली. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिणामी, अद्याप बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केही पूर्ण झाले नाही. केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले. उर्वरित शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. पीक कर्ज वाटपासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असले तरी बँकांमध्ये कर्ज वाटपाबाबत असलेली उदासिनता शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे. यामुळे किती शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्नच अनुत्तरीत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत बँकांना निर्देश द्यावे व शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)