शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: December 8, 2015 02:45 IST

येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून

हिंगणघाट : येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार हिंगणघाट बाजार सिमतीत उजेडात आला आहे. कापूस जिनिंगमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दर्जाबाबत वाद उपस्थित करून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे, असे निवदेन काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांना सादर केले. जिल्ह्यातील मोठी व शेतकऱ्यांच्या हिताची बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहेत. येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा व्यापाऱ्यांनी नवाच प्रकार सुरू केला आहे. बाजार समितीत एका दरात कापूस खरेदी करायचा, यानंतर सदर कापूस जिनिंगवर गेला असता त्यांच्या दर्जाबाबत कारण काढत शेतकऱ्यांची वाद घालत त्याला कमी पैसे देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार वाढत असून यावर आळा आणण्याकरिता बाजार समितीत ग्रेडर आणावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांपासून खरेदी केलेला शेतमाल व्यापाराचा होत असल्याने तो गाडीतून काढण्याची जाबाबदारी व्यापाऱ्याची असताना व्यापारी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या समस्यांकडे तीन दिवसात निर्णय, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवदेन देणाऱ्यांनी दिला आहे. यावेळी छत्रपती रामराव वादाफळे, प्रशांत वादाफळे, अंकित दारूंडे, पवन बावणे, गणेश दारूंडे, रघुनाथ दारूंडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)