शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे!

By admin | Updated: January 24, 2016 02:07 IST

चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे.

किशोर तिवारी : शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयावर व्याख्यानहिंगणघाट : चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. त्यांच्या जीवावर जगणारे व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाही. तेव्हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र शासन विभागाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. भारतीय युवा सस्कार परिषद आणि भारतीय बहुउद्देशीय युवा संस्कार मंडळ, हिंगणघाटच्या वतीने आयोजित आयोजित व्याख्यानमालेत शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयांवर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे सभापती तथा नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. उद्घाटक म्हणून पं.स. चे. माजी सभापती वासुदेव गौळकार, परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रा. डॉ. शरद कुहीकर, संस्कार मंडळाचे सचिव प्रदीप नागपूरकर आदी उपस्थित होते.चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानमालेची सुरूवात शेतकरी हल्ल्यात शहीद जवान तथा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त बांधवांना दोन मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोठारी यावेळी म्हणाले शेतकरी नसेल तर जगाची आणि शेतीचा कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी कसा सुखी होईल याकडे शासनाने आणि आपण सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे हे आहे. प्रास्ताविक व सर्वांचा परिचय सचिव प्रदीप नागपूरकर यांनी करून दिला. संचालन योगीराज कोहचाडे, यांनी केले. आभार उषा साजापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन काळे, गजानन नांदुरकर, मोतीराज मून, रवी धनकर, मनीष हिवंज, गौरव मेश्राम, अशोक येकेश्वर, मोहन वैरागडे, श्रृती कोहचाडे, अर्चना घ्यारे, नैतिक मून, केशव नक्षिणे, डॉ. मिलिंद मुळे, नरेंद्र पोहनकर, गजानन गिरोलकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाहीबहुतेक उद्योग हे शेतीवर चालतात. असे असतानाही उद्योजक, व्यापारी, दलाल हे कधीच आत्महत्या करीत नाही. पण ज्यांच्या जीवावर हे सर्व जगतात तो मात्र बिकट परिस्थितीत जीवन जगत असून प्रसंगी मरण पत्कारत आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि राहकीय उसासीनता यामुळे ही परिस्थिती आल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.