शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे!

By admin | Updated: January 24, 2016 02:07 IST

चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे.

किशोर तिवारी : शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयावर व्याख्यानहिंगणघाट : चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. त्यांच्या जीवावर जगणारे व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाही. तेव्हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र शासन विभागाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. भारतीय युवा सस्कार परिषद आणि भारतीय बहुउद्देशीय युवा संस्कार मंडळ, हिंगणघाटच्या वतीने आयोजित आयोजित व्याख्यानमालेत शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयांवर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे सभापती तथा नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. उद्घाटक म्हणून पं.स. चे. माजी सभापती वासुदेव गौळकार, परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रा. डॉ. शरद कुहीकर, संस्कार मंडळाचे सचिव प्रदीप नागपूरकर आदी उपस्थित होते.चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानमालेची सुरूवात शेतकरी हल्ल्यात शहीद जवान तथा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त बांधवांना दोन मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोठारी यावेळी म्हणाले शेतकरी नसेल तर जगाची आणि शेतीचा कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी कसा सुखी होईल याकडे शासनाने आणि आपण सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे हे आहे. प्रास्ताविक व सर्वांचा परिचय सचिव प्रदीप नागपूरकर यांनी करून दिला. संचालन योगीराज कोहचाडे, यांनी केले. आभार उषा साजापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन काळे, गजानन नांदुरकर, मोतीराज मून, रवी धनकर, मनीष हिवंज, गौरव मेश्राम, अशोक येकेश्वर, मोहन वैरागडे, श्रृती कोहचाडे, अर्चना घ्यारे, नैतिक मून, केशव नक्षिणे, डॉ. मिलिंद मुळे, नरेंद्र पोहनकर, गजानन गिरोलकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाहीबहुतेक उद्योग हे शेतीवर चालतात. असे असतानाही उद्योजक, व्यापारी, दलाल हे कधीच आत्महत्या करीत नाही. पण ज्यांच्या जीवावर हे सर्व जगतात तो मात्र बिकट परिस्थितीत जीवन जगत असून प्रसंगी मरण पत्कारत आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि राहकीय उसासीनता यामुळे ही परिस्थिती आल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.