शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

By admin | Updated: October 21, 2015 02:22 IST

तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले.

दुरूस्तीची प्रतीक्षा : तुटलेल्या कठड्यांमुळे अपघातांचा धोकावर्धा : तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पुलावर कठडेही बसविण्यात आले होते; पण काहीच दिवसांत कठड्यांची दुरवस्था झाली. या कठड्यांची दुरूस्ती गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा तालुक्यातील हमदापूर ते सेलू या मार्गावरील कुटकी व तळोदी या दोन गावांच्या मधून धाम नदी वाहते. रहदारी सुलभ व्हावी म्हणून २००९ मध्ये या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून आठ मिटर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पुलाचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलावरील कठडे सध्या ध्वस्त झाले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हमदापूर परिसरातील नागरिक सेलूला जाण्याकरिता कुटकी-तळोदी मार्गाचा अवलंब करतात. यामुळे रहदारी अधिक असते. पावसाळ्यात नदीला पूर असल्यावर या पुलावरून ये-जा करावी लागते. कधी तर पुलावरूनही पाणी वाहत असते. दरम्यान, पुलावरून जर कुणी गेले तर वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप पुलाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याचेच दिसून येते.(कार्यालय प्रतिनिधी)पाईप व अँगल्स वाकलेलेया पुलाला लावलेले पाईप आणि अँगल्स वाकलेल्या स्थितीत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलावरील काही भागातील अँगल्स तर बेपत्ता झाले आहेत. काही पाईपही चोरीस गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कठड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.अँगल्स निसटण्याची भीतीपुलाला लावण्यात आलेले काही अँगल्स चोरी गेले. पुलाला नट बोल्टच्या साह्याने अडकून असलेले अँगल्सही निसटण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी पाईपही झुलत आहेत. अँगल्सही पाण्याच्या दिशेने वाकले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दिवसभर सुरू असते रहदारीकुटकी-तळोगदी या मार्गावर दिवसभर रहदारी सुरू असते. याच मार्गाने सेलू ते हमदापूर वाहतूक होते. हा मार्ग सेलू येथून हमदापूर आणि सेवाग्राम येळे जाण्यासाठी जवळचा आहे. यामुळे अनेक वाहने याच मार्गाने हमदापूर वा सेवाग्रामला जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचेहमदापूर ते सेलू हा रहदारीचा मार्ग असल्याने धाम नदीवरील पूल सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याच पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले पाईप, अँगल्सही चोरीला जात आहेत. यामुळे रहदारीच धोक्यात आली आहे. या पुलावरून रात्री-बेरात्री वाहतूक होते; पण कठडे भग्न असल्याने रात्री ये-जा करणे कठीण आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहेयाबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.