शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

By admin | Updated: October 21, 2015 02:22 IST

तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले.

दुरूस्तीची प्रतीक्षा : तुटलेल्या कठड्यांमुळे अपघातांचा धोकावर्धा : तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पुलावर कठडेही बसविण्यात आले होते; पण काहीच दिवसांत कठड्यांची दुरवस्था झाली. या कठड्यांची दुरूस्ती गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा तालुक्यातील हमदापूर ते सेलू या मार्गावरील कुटकी व तळोदी या दोन गावांच्या मधून धाम नदी वाहते. रहदारी सुलभ व्हावी म्हणून २००९ मध्ये या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून आठ मिटर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पुलाचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलावरील कठडे सध्या ध्वस्त झाले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हमदापूर परिसरातील नागरिक सेलूला जाण्याकरिता कुटकी-तळोदी मार्गाचा अवलंब करतात. यामुळे रहदारी अधिक असते. पावसाळ्यात नदीला पूर असल्यावर या पुलावरून ये-जा करावी लागते. कधी तर पुलावरूनही पाणी वाहत असते. दरम्यान, पुलावरून जर कुणी गेले तर वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप पुलाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याचेच दिसून येते.(कार्यालय प्रतिनिधी)पाईप व अँगल्स वाकलेलेया पुलाला लावलेले पाईप आणि अँगल्स वाकलेल्या स्थितीत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलावरील काही भागातील अँगल्स तर बेपत्ता झाले आहेत. काही पाईपही चोरीस गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कठड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.अँगल्स निसटण्याची भीतीपुलाला लावण्यात आलेले काही अँगल्स चोरी गेले. पुलाला नट बोल्टच्या साह्याने अडकून असलेले अँगल्सही निसटण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी पाईपही झुलत आहेत. अँगल्सही पाण्याच्या दिशेने वाकले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दिवसभर सुरू असते रहदारीकुटकी-तळोगदी या मार्गावर दिवसभर रहदारी सुरू असते. याच मार्गाने सेलू ते हमदापूर वाहतूक होते. हा मार्ग सेलू येथून हमदापूर आणि सेवाग्राम येळे जाण्यासाठी जवळचा आहे. यामुळे अनेक वाहने याच मार्गाने हमदापूर वा सेवाग्रामला जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचेहमदापूर ते सेलू हा रहदारीचा मार्ग असल्याने धाम नदीवरील पूल सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याच पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले पाईप, अँगल्सही चोरीला जात आहेत. यामुळे रहदारीच धोक्यात आली आहे. या पुलावरून रात्री-बेरात्री वाहतूक होते; पण कठडे भग्न असल्याने रात्री ये-जा करणे कठीण आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहेयाबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.