शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
4
गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश
5
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
6
इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...
7
Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंब्रा- कळवा मार्गावर लोकलची बैलाला धडक
8
अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
9
पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये
10
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
11
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
12
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
13
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
14
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
15
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
16
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
17
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
18
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
19
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
20
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...

कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

By admin | Updated: October 21, 2015 02:22 IST

तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले.

दुरूस्तीची प्रतीक्षा : तुटलेल्या कठड्यांमुळे अपघातांचा धोकावर्धा : तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पुलावर कठडेही बसविण्यात आले होते; पण काहीच दिवसांत कठड्यांची दुरवस्था झाली. या कठड्यांची दुरूस्ती गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा तालुक्यातील हमदापूर ते सेलू या मार्गावरील कुटकी व तळोदी या दोन गावांच्या मधून धाम नदी वाहते. रहदारी सुलभ व्हावी म्हणून २००९ मध्ये या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून आठ मिटर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पुलाचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलावरील कठडे सध्या ध्वस्त झाले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हमदापूर परिसरातील नागरिक सेलूला जाण्याकरिता कुटकी-तळोदी मार्गाचा अवलंब करतात. यामुळे रहदारी अधिक असते. पावसाळ्यात नदीला पूर असल्यावर या पुलावरून ये-जा करावी लागते. कधी तर पुलावरूनही पाणी वाहत असते. दरम्यान, पुलावरून जर कुणी गेले तर वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप पुलाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याचेच दिसून येते.(कार्यालय प्रतिनिधी)पाईप व अँगल्स वाकलेलेया पुलाला लावलेले पाईप आणि अँगल्स वाकलेल्या स्थितीत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलावरील काही भागातील अँगल्स तर बेपत्ता झाले आहेत. काही पाईपही चोरीस गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कठड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.अँगल्स निसटण्याची भीतीपुलाला लावण्यात आलेले काही अँगल्स चोरी गेले. पुलाला नट बोल्टच्या साह्याने अडकून असलेले अँगल्सही निसटण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी पाईपही झुलत आहेत. अँगल्सही पाण्याच्या दिशेने वाकले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दिवसभर सुरू असते रहदारीकुटकी-तळोगदी या मार्गावर दिवसभर रहदारी सुरू असते. याच मार्गाने सेलू ते हमदापूर वाहतूक होते. हा मार्ग सेलू येथून हमदापूर आणि सेवाग्राम येळे जाण्यासाठी जवळचा आहे. यामुळे अनेक वाहने याच मार्गाने हमदापूर वा सेवाग्रामला जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचेहमदापूर ते सेलू हा रहदारीचा मार्ग असल्याने धाम नदीवरील पूल सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याच पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले पाईप, अँगल्सही चोरीला जात आहेत. यामुळे रहदारीच धोक्यात आली आहे. या पुलावरून रात्री-बेरात्री वाहतूक होते; पण कठडे भग्न असल्याने रात्री ये-जा करणे कठीण आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहेयाबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.