शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

फळांबाबत ग्राहकांमध्ये केवळ गैरसमज

By admin | Updated: May 10, 2015 01:39 IST

डॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात.

पराग मगर वर्धाडॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु बदलते वातावरण आणि वाढती मागणी यामुळे ही फळे रसायनांनी पिकवली जात असावी, असा नागरिकांना समज असतो. यात सत्यता किती हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने वर्धा शहरातील फळाचे मुख्य व्यापारी व वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन तसेच येथील फळे पिकवित असलेल्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापारी सदस्यांनी या प्रक्रियेबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी असलेल्या भावना व्यक्त करीत अतिशय नैसर्गिक पद्धतीने ही फळे पिकविल्या जात असल्याचे सांगितले. वर्धा शहरात इतवारा परिसरात असलेल्या वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून शहरात हंगामी फळांचा पुरवठा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केला जातो. यात मुख्यत्वे पपई, केळी, आंबा, तरबूज अशा फळांचा समावेश असतो. आंब्याचे उत्पादन जिल्ह्यात होत नसल्याने त्याची आयात केली जाते. कच्चा आंबा मागवून तो पिकविला जातो. त्यामुळे तो पिकवताना रसायनांचा वापर केला जात असावा असा सामान्यांचा नेहमीचा समज असतो. परंतु वास्तव वेगळे असून केवळ गैरसमजामुळे आम्ही बदनाम असल्याचे हे व्यापारी सांगतात. फळांना इंजेक्शन कधीच दिले जात नाहीपपई, टरबूज आदी फळे पिकविताना तसेच त्यांना चांगला रंग येण्यासाठी इंजेक्शन टोचले जातात असाही समज नागरिकांमध्ये आहे. वास्तविकता, जर या किंवा कोणत्याही फळाला इंजेक्शन किंवा कुठलीही वस्तू टोचल्यास ही फळे दोन ते तीन तासातच खराब होतात. त्यामुळे असे कुठलेही इंजेक्शन दिले जात नसल्याचेही फळव्यापारी सांगतात. पपई, टरबूज आदी फळे ही पिकण्याच्या तयारीत असतानाच शेतकऱ्यांकडून घेतली जातात. उन्हाळ्यात ती लवकरच पिकतात. त्यामुळे ती रसायनाने पिकविण्याचा प्रश्नच नसतो असेही व्यापारी सांगतात. जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधून आंब्याची आयात केली जातो. केवळ बेगमपल्ली आंब्याचीच आयात केली जात आहे. दररोज जवळपास १२ टन आंब्याची आवक होत असते. यातील पाच ते सहा टन आंब्याची विक्री होत असते. आणलेल्या कच्च्या आंब्याची सर्वप्रथम पाहणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस या आंब्याचा गरम जागेत माच घातला जातो. त्यानंतर हे आंबे कॅरेटमध्ये कागद पसरवून त्यामध्ये भरले जातात. यानंतर एका उबदार खोलीत हा आंबा पाच दिवसांसाठी व्यवस्थित झाकून ठेवला जातो. त्यानंतर सहाव्या दिवशी हा आंबा उघडला जातो. त्यानंतर पुन्हा सर्व आंब्यांची एकदा तपासणी करून तो विक्रीसाठी तयार होतो.