शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्हा परिषद शाळांत पटसंख्येची घसरण

By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांतील पटसंख्या दरवर्षी घटत असल्याचे गत काही वर्षांपासून दिसून येत आहे़

विजय माहुरे - घोराडग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांतील पटसंख्या दरवर्षी घटत असल्याचे गत काही वर्षांपासून दिसून येत आहे़ यामुळे पूढील काही वर्षांत या शाळा ओस तर पडणार नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे़सेलू पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या १११ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत़ या शाळांत गत शैक्षणिक सत्रात ५ हजार ४९१ विद्यार्थी शिक्षण घेत होते़ सध्या सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रात ५ हजार २५२ पटसंख्या आहे. जवळपास २४२ विद्यार्थ्यांनी संख्या घसरली आहे़ शाळेच्या पहिल्या वर्गात विद्यार्थी संख्या कमी झाली असल्याचे निदर्र्शनास येत आहे़ ३० सप्टेंबर ही पदनिर्धारणाची अंतिम तारीख असल्याने विद्यार्थी संख्येत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे़ असे असले तरी २०० विद्यार्थ्यांनी पटसंख्या कमी होत असल्याने हे शाळा ओस पडण्याचे द्योतकच मानले जात आहे़ १११ शाळांपैकी प्राप्त केलेल्या आकडेवारीनुसार ८ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या आहे़ यात हिवरा, चिंचोली, आलगाव, पिपरी, गोहदा, डोंगरगाव, मेणखत, कामठी या प्राथमिक शाळांचा समावेश आहे़तालुक्यात असलेल्या उच्च श्रेणीच्या शाळा नव्या नियमानुसार प्राथमिक होत आहेत़ उच्च श्रेणी शाळेचा दर्जा हा २०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळांनाच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे़ शाळांच्या सुसज्ज इमारती, विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची सुविधा मिळत असताना अलीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीचा पगडा पालकांच्या मनावर घट्ट बसला आहे़ गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांचा कल बदलला आहे़ जि़प़ शाळांनी शिक्षणाचे दालण गाव-खेड्यात खुले केले़ त्या शाळांतून चांगले विद्यार्थीही घडले व ते उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहे़ राजकारण, समाजकारण यात पुढे आहे़ अशा शाळांकडे बदलत्या परिस्थितीमुळे पाठ फिरवावी, हे चिंतनीय आहे़ शिक्षण विभागाने याचा विचार करणेच अगत्याचे ठरत आहे़