शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वानवा

By admin | Updated: September 26, 2016 02:22 IST

शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वाणवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

प्रत्येक १५ दिवसांनी एटीएम पडतात बंद : ग्रीन चॅनल काऊंटर दोन महिन्यांपासून ठप्परूपेश मस्के  कारंजा (घा.)शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वाणवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आहे त्या स्थितीत व्यवहार पार पाडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याकडे लक्ष देत बँकांतील असुविधा दूर करणे गरजेचे झाले आहे. भारतीय स्टेट बँक असो वा बँक आॅफ इंडिया आठ-आठ दिवस एटीएम मशीन बंद असतात. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एटीएमच्या प्रवेशव्दारावर दिमाखात १५-१५ दिवस एटीएम मशीन खराब, तांत्रिक बिघाडाचे फलक लागलेले असतात; पण एटीएम मशीन त्वरित दुरूस्त व्हाव्या म्हणून उपाययोजना केल्या जात नाही. बँकीेंग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञाचा वापर होत आहे; पण त्याचा नागरिकांना फायदा होताना दिसत नाही. उलट नागरिकांना कित्येक तास रांगेत ताटकळावे लागते. बँकेतील अपुरी जागा आणि बसण्याची तोकडी व्यवस्था यामुळे ग्राहकांना उभेच राहावे लागते. बँकींग क्षेत्र नागरिकांना कसे सोपे करता येईल, या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांना देव-घेवीचे रोखीचे व्यवहार करणे सोपे व्हावे म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. असे असले तरी रोखपालांचे आडमुठे धोरण आडवे येत आहे. मशीन सुरू असताना खराब असल्याची बतावणी करून नाहक त्रास दिला जातो. भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेत टोकण मशीन लावण्यात आले. याद्वारे स्क्रिनवर टोकण क्रमांक ‘डिस्प्ले’ होतो. यांनतरच नागरिकांना रोख जमा वा काढण्यासाठी खिडकीवर जावे लागते; पण रोखपाल जोपर्यंत या मशीनला ‘नेस्क्ट कमांड’ देत नाही, तोपर्यंत पुढील टोकण नंबर दिसत नाही. यात नागरिकांची रोखपालांद्वारे बोळवण केली जात असल्याचे दिसते. या तंत्रज्ञानामुळे व्यवहार सुरळीत होतील व रांग लागणार नाही, हा उद्देश असला तरी शेवटी मशीन ती मशीनच असते. त्याला ‘आॅपरेट’ करणाऱ्या कर्मचाऱ्यातच सुधारणा होणे गरजेचे आहे. असे झाले तर मशीनचा उपयोग होईन, अन्यथा ती ग्राहकांना तापदायक ठरते. असाच प्रकार स्टेट बँकेत घडत असल्याने रांगच बरी होती, अशा प्रतिक्रीया ग्राहक व्यक्त करतात. रांगेपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकांमध्ये ‘ग्रीन चॅनल काऊंटर’ सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएमव्दारेच व्यवहार करायचे आहे; पण सदर मशीन दोन महिन्यांपासून बंद असल्याचे सांगण्यात येते. ती दुरूस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारंजा शहरात दोन एटीएम मशीन आहे. यातील एक बँक आॅफ इंडिया तर दुसरे स्टेट बँकेचे आहे. हे दोन्ही एटीएम आळीपाळीने बंद असतात. यामुळे ग्राहकांना भटकंतीच करावी लागते. शहरात बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. सदर शाखेचे एटीएम नाही. शिवाय बँकेत सुविधाही नाहीत. येथील शाखा व्यवस्थापकाच्या हेकेखोरीमुळे नागरिक त्रस्त आहेत. ही शाखा वरच्या मजल्यावर असल्याने नागरिकांना चढ-उतर करताना त्रास सहन करावा लागतो. जेष्ठ नागरिक वा अपंगांना तर या शाखेचे व्दारच बंद झाल्याची स्थिती आहे. शहरात यापेक्षा इतर चांगल्या व जमीनस्तरावर इमारती उपलब्ध असताना उंचावर जाण्याचे कारण काय, हे कळण्यास मार्ग नाही. प्रारंभी ही शाखा खालच्या मजल्यावर होती, ती आता स्थानांतरीत करण्यात आली. बँकांतील या प्रकाराने ग्राहक संतप्त असून सुविधा पुरविणे गरजेचे झाले आहे.