शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

शेतांमध्ये तणनाशकाचा अतिवापर

By admin | Updated: August 12, 2014 00:06 IST

मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे.

जमिनीची सुपिकता धोक्यात : मजुरांचा तुटवडा प्रमुख कारणपवनार : मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे. बाजारात मिळणारे ग्लायफोसेट नावाचे तणनाशक स्वस्त असल्यामुळे शेतकरी त्याचा सर्रास वापर करतात. हाय जॅक राऊंड अप, ग्लायसेल या विविध नावाने उपलब्ध असलेल्या या तणनाशकाच्या वापरावर अमेरिकेसारख्या राष्ट्राने बंदी घातली आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात कृषीविषयक कुठलेही निश्चित धोरण नसल्यामुळे काही बाबींचा अतिरेक होताना दिसतो. भारतीय शेतकरी शास्त्रीय दृष्ट्या अनभिज्ञ असल्यामुळे खर्चात बचत होण्यासाठी तो विविध क्लूप्त्या वापरत असतो. कपाशीसारख्या पिकासाठी हे तणनाशक चालत नसतानासुद्धा गार्ड वापरून सदर पिकामध्ये फवारणी केली जाते. बी. टी. कापूस आल्यामुळे कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पर्यायाने बाजारातील कीटकनाशकाच्या खपावर त्याचा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्यांची हीच नाडी ओळखून तणनाशकाचे संशोधन केले व शेतकऱ्यांमध्ये त्या बाबतीत जागृती करून, त्यांची मानसिकता तयार केली. आजघडीला बाजारात सर्वात जास्त तणनाशक विकली जातात. भविष्यात तणनाशकाच्या अति वापराचा काय परिणाम होईल याचा विचार कुणीही करायला तयार नाही. शासनाने शेतकऱ्यांमध्ये जागृती करून शेतकऱ्यांना याचे दूरगामी परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे. एकीकडे शासन राऊंड अप रेडी बी टी कॉटनला परवानगी नाकारते तर दुसरीकडे तणनाशकाच्या वापरावर मात्र निर्बंध घालत नाही. त्यामुळे कृषी खाते केवळ नावापुरतेच राहिले आहे का असा प्रश्न नागरिक व्यक्त करतात. अनुदानाचे वाटप व नुकसानीचा सर्व्हे करणे एवढेच काम त्यांचेकडे शिल्लक असल्याचे बोलल्या जात आहे. कृषी सहाय्यक कधीच गावामध्ये येताना दिसत नाही. एका कृषी साहाय्यकाकडे १५ ते २० गावे असतात. याचा फायदा घेत तोही कुठल्याच गावात जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या योजनाही सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी सांगितली जाते मात्र पावसाचा एक थेंबही पडत नाही. या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत तणनाशक न वापरण्यावर व्यापक जागृती करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)