शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांना पोरकी करणारी ‘एक्झिट’

By admin | Updated: November 16, 2015 00:35 IST

प्रमोद शेंडे हे नाव कानी पडताच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा थरकाप उडायचा. ही दहशत नव्हती, तर त्यांची विकासासाठी असलेली तळमळ त्यातून अधोरेखीत होत होती.

राजेश भोजेकर वर्धाप्रमोद शेंडे हे नाव कानी पडताच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा थरकाप उडायचा. ही दहशत नव्हती, तर त्यांची विकासासाठी असलेली तळमळ त्यातून अधोरेखीत होत होती. मतदार संघावर मजबूत पकड आणि प्रशासनावर वचक अशी ख्याती असलेल्या लोकनेत्याची ‘एक्झिट’ तमाम चाहते व कार्यकर्त्यांना पोरकेपणा देऊन गेली.रुबाबदार व्यक्तिमत्वाचे धनी असलेले प्रमोद शेंडे यांची राजकारणातील एन्ट्रीही तितकीच दमदार होती. राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केल्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. १९७८ ला त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाऊल ठेवले. यानंतर वर्धा मतदार संघासाठी विकासाचे द्वारच उघडे झाले. त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे आजही मजबूतीची साक्ष देत आहे. कामे करवून घेण्याची त्यांची हातोटी होती. कोणतेही विकास काम असो ते स्वत: त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसत आणि काम करवून घेत. त्यातच त्या कामाचा मजबूतपणा लक्षात घेण्यासारखा होता. याच कारणाने जनतेनेही त्यांच्या आपला नेता म्हणून भरभरुन प्रेम केले. तब्बल सहावेळा त्यांनी वर्धा विधानसभा मतदार संघाचे नेतृत्त्व केले.ते याच प्रेमाच्या जोरावर. याच बळावर त्यांनी राज्याच्या राजकारणातही वेगळी छाप सोडली. परखड आणि स्पष्टवक्ता असलेला नेता म्हणून ते महाराष्ट्राच्या जनतेला परीचित झाले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात कृषी व लाभ क्षेत्र राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी पदाला न्याय दिला. तब्बल दहा वर्षे विधानसभेचे उपाध्यक्ष पद भुषविले. हा वर्धा मतदार संघातील जनतेचा सन्मान होता. ही पदे भुषवतताना त्यांनी आपला परखड बाण्याशी तडजोड केली नाही. विधानसभाही आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे गाजविली.उपाध्यक्ष असताना वर्धा मतदार संघात विकास कामे करताना अडचण कधीच आली नाही. त्यांनी ज्या आमदार वा मंत्र्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी दिले तेसुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हते. सहाव्यांदा ते आमदार झाल्यानंतरचा काळ मात्र त्यांच्यासाठी वेदनादायक ठरला. या नेत्याने आपले अख्ख आयुष्य जनतेसाठी वेचले. त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. शरीर त्यांना साथ देत नव्हते. परिणामी ते सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढू शकले नाही. चिरंजीव शेखर शेंडे यांना जनतेनी निवडून दिलेले बघायचे आहे ही त्यांची शेवटची इच्छा होती. हे स्वप्न अपूर्ण ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या लोकनेत्याच्या निधनाच्या वार्तेवर त्यांच्या चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते या दु:खद बातमीची शहानिशा करण्यासाठी धडपडत होते. मागील साडेपाच वर्षे ते जनसंपर्कात नसतानाही त्यांच्यावरील जनतेचे प्रेम तसुभरही कमी झाले नव्हते. असंख्य जनसमुदायांच्या साक्षीने सुरू झालेला या लोकनेत्याचा अखेरचा प्रवासही हेच सुचवत होता. ते आयुष्यभर पक्षासाठी झटले. पक्षाच्या पडतीच्या काळातही ते एकनिष्ठ राहिले. अखेरचा श्वासही काँग्रेसचेच नेते म्हणून घेतला. त्यांच्या जाण्याने वर्धा जिल्ह्याचीच नव्हे, तर विदर्भाची काँग्रेस एका दमदार नेत्याला मुकली आहे. ते अंथरुनावर असले तरी कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांचा वास होता. त्यांचा सहवास जाणवणारा होता. पाठीवर हात असल्याचा आभास होता. हा आभासच आता हरपल्याने कार्यकर्ते पितृतुल्य नेतृत्त्वाला पोरके झाले आहे. ही पोकळी भरुन निघणे कठिणच हे भाव या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या तमाम कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते.